By : Polticalface Team ,22-07-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.बारामती ता २२ जुलै २०२४. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ वी सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा वर्ष १० वे. श्री छत्रपती सह.सा. कारखाना-भवानीनगर बारामती इंदापूर रोड भवानीनगर. ग्राउंड येथे दि २१ जुलै रोजी जयंती उत्सव विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती साखर कारखाना भवानीनगर येथील विविध क्षेत्रातील महिलांसह मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष व 299 वी जयंती उत्सव चे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन दर वर्षी प्रमाणे केले होते. आयोजक : अहिल्याक्रांती महिला विकास प्रतिष्ठान सौ. कल्याणीताई वाघमोडे व महिला समिती सकल धनगर समाज/सर्व सहयोगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान केले. सर्व महापुरुषांचे स्मारक प्रतिमांना अभिवादन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार आयोजकांच्या हस्ते करण्यात आले या वेळी. प्रस्ताविक मनोगत व्यक्त करताना कल्याणी वाघमोडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून असे उत्सव करणे गरजेचे आहे. आज पर्यंत राजकीय पक्षांनी फक्त मतांसाठी अहिल्यादेवी च्या नावाचा व धनगर -ओबीसी समाजाचा वापर केला आहे अशी खंत व्यक्त केली. हा सामाजिक कार्याचा विचार अखंडपणे चालू राहील असा विश्वास व्यक्त करत अठराव्या शतकातील उत्तम प्रशासक असणाऱ्या व २८ वर्षे राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे मत कल्याणी वाघमोडे यांनी बोलताना व्यक्त केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ वी सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने अहिल्या रत्न पुरस्काराने स्वर्गीय बी.के.कोकरे यांचे सुपुत्र विशाल कोकरे यांना गौरवण्यात आले. या वेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी चळवळीचे महत्त्व व स्वर्गीय बी.के कोकरें याचा लढा या बाबत विचार व्यक्त केले. चळवळ नेहमी जागृत राहिली पाहिजे आणि ती चालवण्याचे काम वाघमोडे कुटुंब करत आहे हि अतिशय कौतुकास्पद बाब आहे. मेंढपाळ समाजाने देखील शिक्षण घेऊन समाज जन जागृतीचे कार्य केले पाहिजे. तसेच जयंतीच्या माध्यमातून सामाजिक चळवळ जागृत राहिली पाहिजे, कल्याणी वाघमोडे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे -विशाल बी.के कोकरे यांनी बोलताना मत व्यक्त केले.समाजरत्न पुरस्कार म्हणून धनगर आरक्षण उपोषण कर्ते चंद्रकांत वाघमोडे, लेखिका व कवयित्री स्वाती तोंडे, निरगुडे ग्रा.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या साधना केकाण, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा मुलाणी, स्व.शंकरराव नारायण सोट पाटील संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील. दलित पॅंथर चे हर्षल वाघमारे, ज्येष्ठ समाजसेविका मंजुळाताई रुपनवर, लक्ष्मी करे, लोकशाही न्यूज व मानवाधिकार फाउंडेशनचे धनराज जगताप, तलाठी परीक्षा उत्तीर्ण झालेले सचिन वाघमोडे आणि उल्लेखनीय म्हणून आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली कुस्तीपटू रोहिणी देवबा, महाराष्ट्र केसरी पै.अमृता पुजारी यांना गौरवण्यात आले. दहावी तील ९२ टक्के मार्क्स मिळवलेली शुभांगी खरात, संस्कृती रुपनवर (८४ %), कल्याणी बंडगर ( ९०%), बारावीतील वैभवी देवकाते ( ८५ %), सिद्धी पांढरे (८५%) आदी विद्यार्थ्यांना सत्कार करुन गौरविण्यात आले. तसेच या प्रसंगी माळशिरस आणि दौंड तालुक्यातील गझी ढोल नृत्य स्पर्धाकांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होती. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य राहुल भाऊ झारगड, दत्तात्रेय भाऊ पुणेकर, ढेकळवाडी चे माजी सरपंच नानासो घुले,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अण्णा देवकते, जय हिंद सेनेचे सनी पाटील, योद्धा प्रोडक्शन चे योगेश नालंदे,प्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुकशाला ढाणे,शालन पांढरे, ज्योती मारकड, पूनम चोपडे,अविनाश भिसे,अजितभाऊ घुले ,भूषण टकले, सचिन गडदे, वामन भिसे सर , नाना सोलनकर, संकेत देवकाते , निखिल पाटील, धनसिंग पाटील आदी सह युवा मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. महिलांच्या मनोरंजन कार्यक्रमात विजेत्या स्वरांजली पांढरे यांनी पैठणी जिंकली. आभार व मनोगत डॉ.सुजित वाघमोडे यांनी मानले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बुरुंगले व विलास दोलतडे यांनी केले छायाचित्रण प्रशांत कुचेकर यांनी केले.
वाचक क्रमांक :