अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

By : Polticalface Team ,16-10-2024

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

  लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील नुकसानग्रस्त शेतकरी श्री संतोष भिमाजी आल्हाट यांच्या गॅलन वांग्याचे पाऊस व वाऱ्याच्या प्रवाहामुळे छत उडून गेल्याने जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांच नुकसान झाले. ही घटना सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी घडली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा 16 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रात सविस्तर प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व  कर्मचारी खडबडून जागे झाले आणि 16 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वांग्याच्या बागेची पाहणी केली. 

      दरम्यान कृषी सहाय्यक केशव अनारसे व कामगार तलाठी अमोल कदम यांनी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांच्या गॅलन वांग्याच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी वांग्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. कृषी सहाय्यक अनारसे व कामगार तलाठी कदम यांनी संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य तो नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना अहवाल सादर करू असे आश्वासन यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले. 

दरम्यान दीड महिन्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकरी श्री संतोष आल्हाट यांच्या दोडका बागेचे मोठे नुकसान झाले या बागेच्या देखभालीसाठी त्यांना जवळपास सहा लाख रुपये खर्च आला. परंतु अचानक वादळ आणि वाऱ्याचा प्रवाहामुळे आता तोंडाशी आलेले उत्पन्न  दोडका बागेवरील छत उडून गेले. त्यामुळे दोडका पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे. त्यावेळी देखील सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु त्यावेळी तालुका प्रशासनाने या नुकसानीचे गांभीर्य घेतले नाही. नुकसानीची माहिती तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आली होती परंतु या नुकसान ग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. किमान आता तरी श्री आल्हाट यांच्या गॅलन वांग्याच्या नुकसानीचा संबंधित कृषी सहाय्यक व कामगार तलाठी यांनी समक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. शासन स्तरावरून संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांना शासन नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी यावेळी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट समवेत कृषी सहाय्यक केशव अनारसे; कामगार तलाठी अमोल कदम; सहाय्यक महसूल कर्मचारी श्री प्रकाश जाधव आदींनी गॅलन वांग्याच्या नुकसानीचा पंचनामा केला.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन