इंदिरा गांधी विद्या निकेतन, विद्यालयात मतदान जनजागृती अभियान संपन्न ! लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे – सत्यजित मच्छिंद्र

By : Polticalface Team ,24-10-2024

इंदिरा गांधी विद्या निकेतन, विद्यालयात मतदान जनजागृती अभियान संपन्न ! लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे – सत्यजित मच्छिंद्र

लिंपणगाव ( प्रतिनिधी) श्रीगोंदा पंचायत समिती शिक्षण विभाग, श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्या निकेतन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोशी वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या  मतदान जागृती अभियान अंतर्गत मतदार जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी मार्गदर्शन केले. “भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जिथे प्रत्येक प्रौढ नागरिक आपल्या मताचा वापर करण्यास स्वतंत्र असतो. सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदारांची महत्वाची भूमिका असते. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमुल्य आहे. एक-एकच्या मताने सरकार बनते आणि बिघडते. म्हणून, प्रत्येकाने निःपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे, आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग निश्चित केला पाहिजे, तसेच देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचीवर येऊ शकेल. आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. मतदार त्यांच्या मताचा उपयोग राष्ट्र उभारणी आणि विकासात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी करू शकतात. देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत आपले मत वापरावे कारण प्रत्येक मत देशाच्या भविष्यातील भागीदार बनते. भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार जनतेसमोर आपले विचार व अजेंडा मांडतात.  दुसरीकडे, ज्या उमेदवाराच्या अजेंड्यावर बहुतेक लोक आपली संमती व्यक्त करतात आणि सर्वाधिक मतदान करतात, त्याच उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जाते आणि ते देशातील सर्व विकासात्मक कामांसाठी जबाबदार असतात. म्हणून, प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मताधिकारांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनीही आपले मत व्यक्त केले. “सशक्त राष्ट्राची सुरुवात तुमच्या मताने होते. प्रत्येक नागरिकासाठी मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, निरोगी लोकशाही निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच, त्यांनी मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केले पाहिजेत आणि सरकारकडून वैध ओळखपत्र मिळविले पाहिजेत.  शेवटी, हे जाणून घ्या की ते फक्त आपला हक्कच नाही तर आपले कर्तव्य देखील आहे. निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविलं तर त्याला तुम्ही भुलू नका.”

सकाळ सत्रात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. प्रभात फेरीचे नियोजन पर्यवेक्षक अनिल जाधव, आरती परकाळे, पुष्पा काळे, वर्षा दरेकर, सुरेखा काळे, संदीप गायकवाड, कल्पक राऊत, शिवाजी क्षीरसागर, मंगेश काकडे, भाऊसाहेब राऊत, माऊली जाधव यांनी केले.

या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम भुजबळ, केंद्रप्रमुख अलका भालेकर, मुख्याध्यापक सुरेश हराळ, माजी मुख्याध्यापक लहू दरेकर, बन्यामीन पवार, बाळकृष्ण रोटकर, शैला जगताप, शमिना शेख व समस्त मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन