पुरावे असतानाही केडगाव येथील तरुणाच्या मृत्यूच्या तपासात दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे करमाळा पोलीसांवर ताशेरे....

By : Polticalface Team ,12-12-2024

पुरावे असतानाही केडगाव येथील तरुणाच्या मृत्यूच्या तपासात दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे करमाळा पोलीसांवर ताशेरे....

करमाळा प्रतिनिधी - 

तालुक्यातील केडगाव येथील  तरुणाच्या मृत्यु प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा पोलीस प्रमुख (सोलापूर ग्रामीण) व करमाळा पोलीस निरीक्षक यांना ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुरावे असतानाही करमाळा पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत कोणतीही दखल न घेतल्याने मयताच्या पित्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील केडगाव येथील अरबाज महंमद पठाण या तरुणाच्या मृत्यु प्रकरणी करमाळा पोलीसांत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला होता. मात्र मयत अरबाज पठाण यांचे आई-वडिल व ग्रामस्थांनी अरबाज पठाण याचा अपघात नसून घातपाती मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला होता. या घटनेच्या सखोल तपासाबाबत त्यांनी वेळोवेळी करमाळा तहसिल व पोलीस स्टेशन कार्यालयावर निषेध मोर्चे काढलेले होते तसेच वेळोवेळी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. परंतु पोलीसांनी यावर कुठलीही दखल घेतली नव्हती.

त्यामुळे महंमद गफूर पठाण यांनी अरबाज पठाण याच्या घातपाताच्या सखोल तपासासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करून सुनावणीवेळी करमाळा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. शिंदे यांना सदर गुन्ह्याबाबत सि.डी.आर., सी.सी. टीव्ही फुटेज व अन्य पुरावे असताना देखील चौकशी न केल्याने खडेबोल सुनावले व अरबाज पठाण याच्या मृत्युबाबत पुन्हा एकदा सखोल चौकशी करून सी. सी. टीव्ही फुटेज, सी.डी.आर फुटेज व अन्य पुरावे गोळा करून ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) व करमाळा पोलीस निरीक्षक यांना आदेश दिलेले आहेत. तसेच सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अहवालासह करमाळा पोलीस व जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) यांना मुंबई उच्च न्यायालयात समक्ष हजर राहण्याबाबतही आदेशीत केलेले आहे.

सदर याचिका महमंद गफूर पठाण यांचे वतीने ॲड. सचिन देवकर (मुंबई) व ॲड. अलिम हामजेखान पठाण करमाळा यांनी दाखल केलेली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

मढेवडगाव चे प्रगतशील शेतकरी राजेंद्र शिंदे यांना आंबा उत्पादक संघाचा आदर्श शेतकरी पुरस्कार

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानवतेचा व समानतेचा- प्रा.अफसर शेख

कोशिमघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम.आनंदी बाजार मेळावा घेऊन बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे दिले धडे.

जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील * छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन

दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग वस्तीगृहातून ७ वी मध्ये शिकत असलेला १२ वर्षाचा विद्यार्थी बेपत्ता. आई वडील झालेत हैराण.

वांगदरी सेवा संस्थेचे अध्यक्षपदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड

सरावानेच खेळाडू घडत असतो - सूनीलराव जाधव (श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते)

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल चे विद्यार्थी खर्ची बंधूंचे ट्रेडिशनल रेस्टलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे.

पत्रकार माधव बनसुडे व त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी बनसुडे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

शेतातील शेतगड्याने मालकाच्या परस्पर घरातील महत्वाच्या वस्तू घेऊन गेला पळून. मळद येथील घटना दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील (बोरीबेल) गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना. १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

छत्रपती महाविद्यालयाचा राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध कॉलेजचे ८०० विद्यार्थी आणि २०० समन्वयक व प्राचार्य यांचा सहभाग.

लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमाला

जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.

अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा