छत्रपती महाविद्यालयास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ३ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.

By : Polticalface Team ,26-01-2025

छत्रपती महाविद्यालयास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ३ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. लिंपणगाव प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सन २०२४-२५ करता करिअर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय ३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून अहमदनगर जिल्ह्यातून व्दितीय क्रमांक, डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांना उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक आणि प्रा.विलास सुद्रिक यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा महाविद्यालयाचा बहुमान आहे. शिवाजीराव नागवडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने १९८२ साली महाविद्यालय सुरू केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. ९९ विद्यार्थी संख्येवर सुरू झालेले महाविद्यालय, आज ४२०० विदयार्थी अध्यापन करत आहे.१६ एकर भौतिक सुविधा असलेला सुंदर परिसर आहे. बापूंच्या संस्कारात वाढलेले राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची उत्तम प्रगती सुरू आहे.‘नॅक’मध्ये मिळविलेले ए प्लस मानांकन आणि पुरस्कारांची हॅट्रिक होणे त्याचे द्योतक आहे. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांनी शुभेच्छा देत, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या कष्टातून उत्तम प्रावीण्य मिळवत आहेत.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाला प्राधान्य दिले जाते. परिणामी उच्चतम निकाल व आधुनिक तंत्रज्ञानचा वापर यामुळे महाविद्यालय नावारूपाला आले असल्याची प्रतिक्रिया दिली. प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने २०२४ या वर्षात ७० विद्यार्थ्यांची पोलीस, वनरक्षक,इतर सरकारी नोकरीमध्ये तसेच कॅम्पस मुलाखतीद्वारे बँक व इंडस्ट्रीमध्ये १४१ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. अनेक विद्यार्थी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातून अध्यापन करत आहेत तसेच प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. “बापूंनी बिकट परिस्थितीत या संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी जीवाचे रान केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करत आहोत” अशी प्रतिक्रिया कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुर्यवंशी यांनी दिली. या यशाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर वृंदाचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस,जिल्हा बँक संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न