नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान

By : Polticalface Team ,02-02-2025

नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव   , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान

   लिंपणगाव( प्रतिनिधी )--सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन- २०24- 25 या गाळप हंगामात ऊसाला ३०५० प्रति मे. टन ऊस भाव जाहीर केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली ग्रामस्थांकडून सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. एरंडोलीच्या सरपंच सौ मनोरमा इथापे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नागवडे कारखान्याचे संचालक सावता शेठ हिरवे; माजी संचालक विलासराव काकडे; माजी सरपंच बाळासाहेब जगताप; संजय इथापे; नरसिंग जगताप; तुकाराम भंडारे सर; संतोष इथापे; मोहन इथापे; मा चेअरमन बाळासाहेब सोनवणे; संस्थेचे संचालक शरद इथापे; प्रा डॉ विकास इथापे सर; शिवाजी इथापे सर; संभाजी इथापे सर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


      यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा डॉ विकास इथापे सर यावेळी म्हणाले की; सहकार आणि नागवडे कुटुंब हे  नाते गेल्या अनेक दशकापासून श्रीगोंदा तालुक्यात घट्ट आहे. सभासद उत्पादकांनी देखील नागवडे कुटुंबावर कारखाना स्थापनेपासून विश्वास व्यक्त केला आहे. नागवडे यांनी देखील वेळोवेळी सभासद हित डोळ्यासमोर ठेवून ऊस भाव देण्याचा प्रयत्न केला. सहकारातून समृद्धी हा मूलमंत्र सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी तालुक्यात राबवल्यामुळे या दुष्काळी तालुक्याला मोठे गतवैभव प्राप्त झाले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. असे सांगून प्रा इथापे पुढे म्हणाले की; कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे हे साखर कारखान्याचा काटकसरीने कारभार पाहून शेतकरी व ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत ही अभिमानाची बाब आहे सहकार महर्षी बापूंचा तोच वारसा  नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संचालक मंडळ निर्णय घेता आहेत. चालू ऊस गाळपास नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी चालू ऊस गाळपास ३०५० उच्चाअंकी ऊस भाव जाहीर केल्याने निश्चितच ऊस उत्पादक व सभासदांना मोठा दिलासा मिळाल्याचे प्रा इथापे यांनी यावेळी सांगितले.


     सूत्रसंचालन तुकाराम भंडारे सर यांनी केले. आभार संभाजी इथापे सर यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक