राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे

By : Polticalface Team ,2024-12-12

राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.

दौंड ता १२ डिसेंबर २०२४  राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. आघाडीला अपयश पचवता येईना म्हणून ते चुकांवर पांघरूण घालत आहेत. भाजपच्या यशामुळे आघाडीची नेते मंडळी सैरभैर झाली आहेत. कार्यकर्ते सत्तेच्या विरोधात फार काळ संघर्ष करू शकत नसल्याने ते भाजपशी जवळीक साधू लागले आहे. त्यांच्या मनात चिलबिचल चालू आहे. ईव्हीएमची विश्वासार्हता माहित असूनही केवळ कार्य़कर्ते टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील आघाडीची जानकार नेते मंडळी सुद्धा ईव्हीएमवर अपयशाचे खापर फोडत आहेत. हेच आश्चर्य वाटत आहे. अशी खरमरीत टिका दौंड तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे. 

ठोंबरे प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणतात की राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी १९९९, २००४, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या. त्यात त्यांना बहुमत मिळाले. तेव्हा मतदान यंत्र चांगले होते.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुतीचे एकमेव राहुल कुल वगळता सर्व आमदार हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे विजयी झाले होते. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला अनपेक्षित विजय मिळाला आहे. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. वायनाडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून निवडून आल्या तेव्हा ईव्हीएम चांगले होते. पंजाब व जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम चांगली. सुप्रियाताई सुळे खासदार झाल्या तेव्हा ईव्हीएम चांगले. अरे काय चालले आहे. मतदारांना तुम्ही मुर्ख समजता का.  शहाण्या मतदारांनी तुमचा करेक्ट कार्य़क्रम केलेला आहे.  


या सर्व वागण्यावरून महाविकास आघाडीची कीव करावी वाटते. ज्या नेत्यांनी एके काळी देशाचे, राज्याचे नेतृत्व केले अशा जाणकार नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घ्यावा ही खेदाची बाब आहे. ईव्हीएम कथित घोटाळ्यावरून  सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फटकारले असले तरी जीव जाईना म्हणून हातपाय खोडायची वेळ महाविकास आघाडीवर आली आहे. 


मुख्यमंत्री लाडकी बहीण, कृषी पंपाचे वीज बिल माफ, शेतकरी सन्मान योजना, शेती कर्ज माफी, घरकुल योजना, आरोग्य सुविधा अशा वैयक्तिक योजनांबरोबर दिर्घकालीन विकासाच्या योजनांमुळे महायुतीला राज्यात मोठे यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात गोळा उठला आहे. पक्षांचे व नेत्यांचे आस्तीत्व टिकवण्यासाठी मविआची ही कोल्हेकुई चालू आहे. मतदार राजा हा सुज्ञ असून महाविकास आघाडीने ही कोल्हेकुई चालूच ठेवली तर त्यांचे उरलेसुरले मतदार देखील कमी होतील. 


दौंडचा विचार केला तर आमदार राहुल कुल यांनी तालुक्याचे पुढील ५० वर्षांचे व्हिजन मतदारांपुढे मांडले आहे. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी येणार ( २२०० कोटी ), हडपसर ते बोरीभडकपर्यतचा सहापदरी उड्डाणपूल ( सहा हजार कोटी रूपये ), मुळशीचे धरणातील पाणी आणणार, प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय सुरू केले. क्रीडा संकुल, नवीन वीज उपकेंद्र ( १७५ कोटी ), रेल्वेवरील खामगाव,सहजपूर येथील उड्डाणपूल, बेबी कालवा अस्तरीकरण ( ३०० कोटी रू. ) अशी कितीतरी कामे सांगता येतील. या विकासकामांना मतदारांनी पसंती दिली आहे. फरक स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने रडगाणं बंद करावे.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

पाटस गावचे भूमिपुत्र श्री.जितेंद्र शिवाजी पानसरे यांची साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती. ग्रामस्थांनी भव्य सत्कार करुन दिल्या शुभेच्छा.

मढेवडगाव चे प्रगतशील शेतकरी राजेंद्र शिंदे यांना आंबा उत्पादक संघाचा आदर्श शेतकरी पुरस्कार

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मानवतेचा व समानतेचा- प्रा.अफसर शेख

कोशिमघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम.आनंदी बाजार मेळावा घेऊन बाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे दिले धडे.

जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील * छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन

दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग वस्तीगृहातून ७ वी मध्ये शिकत असलेला १२ वर्षाचा विद्यार्थी बेपत्ता. आई वडील झालेत हैराण.

वांगदरी सेवा संस्थेचे अध्यक्षपदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड

सरावानेच खेळाडू घडत असतो - सूनीलराव जाधव (श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते)

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल चे विद्यार्थी खर्ची बंधूंचे ट्रेडिशनल रेस्टलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे.

पत्रकार माधव बनसुडे व त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी बनसुडे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान

शेतातील शेतगड्याने मालकाच्या परस्पर घरातील महत्वाच्या वस्तू घेऊन गेला पळून. मळद येथील घटना दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील (बोरीबेल) गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना. १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

छत्रपती महाविद्यालयाचा राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध कॉलेजचे ८०० विद्यार्थी आणि २०० समन्वयक व प्राचार्य यांचा सहभाग.

लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमाला

जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.

अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा