पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.
By : Polticalface Team ,17-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १६ ऑक्टोबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे
पाटस ता दौंड जिल्हा पुणे येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने. सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती भिक्खू हर्षवर्धन शाक्य यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन पाटस येथील राहुल युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कोजागिरी पौर्णिमा वर्षावास समाप्ती दि.१६ ऑक्टोबर रोजी पाटस गावचे विद्यमान सरपंच तृप्तीताई भंडलकर तसेच सदस्य आशाताईं पानसरे यांचे हस्ते पंचशील ध्वज फडकावून करण्यात आली.
या वेळी पाटस येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते तक्षशिला बुद्ध विहारा पर्यंत धम्म रॅली काढण्यात आली. या वेळी बहुसंख्येने समाज बांधव तसेच महिलांणी उपस्थिती दर्शवली होती. बुद्धंग सरणंग गच्छामि उपासिकांच्या सुराणे सर्व परिसरात बुद्धमय वातावरण निर्माण झाले होते.
तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्ताने. सर्व समाज बांधवांनी एकत्रित विहारात येऊन तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती भिक्खू हर्षवर्धन शाक्य यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. या प्रसंगी पाटस ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तृप्ती ताई भंडलकर. सदस्य आशाताई पानसरे. आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
तक्षशिला बुद्ध विहारात भिक्खू हर्षवर्धन शाक्य यांनी उपस्थित उपासकांना धम्म देसना दिली. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली लाखो अनुयायांसह नागपूर दीक्षाभूमी येथे महाथेरो भिकू चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व अनेक कुळांचा उद्धार केला. वर्षावास समाप्ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने तक्षशिला बुद्ध विहार पाटस येथील बौद्ध उपाशिका उपासकांचे धार्मिक काम गतीने पुढे चालविण्यासाठी तक्षशिला बुद्ध विहार व राहुल युवक मंडळाचे युवा तरुण प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. धम्माचा गाडा पुढे नेता आला नाही तरी चालेल पण थांबता कामा नये. अशी प्रतिक्रिया भिक्खू हर्षवर्धन यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयुर पानसरे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉकी पानसरे, सुरज पानसरे, तेजस पानसरे, सागर पानसरे, शिवधन पानसरे आदी युवा तरुणांनी तसेच जेष्ठ मान्यवरांनी महत्त्वपूर्ण विशेष परिश्रम घेतले. पुढील येणाऱ्या काळात पाटस पंचक्रोशीतील परिसरात बौद्ध धम्मकार्याचे प्रबोधनात्मक तसेच विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय व सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन समाज उपयोगी उपक्रम राबविला जाणार असल्याचे. तक्षशिला बुद्ध विहारातील आयोजकांनी संकल्प केला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना खीर भोजन दान करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयुर पानसरे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रेयश जॉकी पानसरे, सुरज पानसरे, तेजस पानसरे, सागर पानसरे, शिवधन पानसरे व इतर सर्व ज्येष्ठ उपासक सभासद युवा तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :