श्रीगोंदा, दि. १६ जुलै २०२४ :
काल सायंकाळी तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली त्यामुळे वेळेवर पडलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. त्याचप्रमाणे कोळगाव येथे जोरदार आषाढ सरींनी हजेरी लावल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांच्या मूग, बाजरी, तुर, कपाशी, हुलगे ,मटकी अशा खरीप पिकांना होणार आहे.
आज दुपारी साडेचार वाजता सायंकाळच्या सुमारास आकाश काळे ढगांनी आच्छादले गेले आणि जोरदार सरिंनी पावसास सुरुवात झाली. सुमारे एक तास झालेल्या जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले. शाळा सुटण्याच्या सुमारास पाऊस पडल्याने विद्यार्थी व पालक यांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. अनेक विद्यार्थ्यांना पावसात भिजतच घरी जावे लागले. परंतु या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
या आषाढ सरींचा फायदा मूग, बाजरी, तूर, मटकी, हुलगे, कापूस, कांदा अशा खरीप पिकांना होणार असल्याने शेतकरी आनंदाला आहे. यंदाच्या वर्षी कोळगाव परिसरात सर्वच नक्षत्रांमध्ये वेळेवर पाऊस पडल्याने आतापर्यंत तरी शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. सतत पाऊस पडत असल्याने शेतामध्ये बांधावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. लव्हाळे माजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तणनाशक फवारणी, पिकांना खते देणे अशी लगबगीने कामे चालू आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.
महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..
मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....
दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .
अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर
विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!
संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर
आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?
करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान
उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन
इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन
राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?
आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक
डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना
बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड
मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल
आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य
मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष
पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान