उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

By : Polticalface Team ,16-10-2024

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

जनआधार न्युज भिमसेन जाधव  सोलापुर: सध्या उजनी धरण १११ टक्के भरले असून, धरणात १२३ टीएमसी पाणी आहे. ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून सोडलेले पाणी आता मंगळवारी (ता. १५) बंद केले जाणार आहे. १५ ऑक्टोबरला धरणात जेवढा साठा असेल, त्या पाण्याचे नियोजन करून आवर्तने निश्चित केली जातात. ऑक्टोबरअखेर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनांचा निर्णय होईल, पण १५ डिसेंबरनंतर शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे

उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर ४ ऑगस्टपासून कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. याशिवाय दहिगाव, सीना-माढा उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यास सुरवात झाली. धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी देखील दररोज १६०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. आता केवळ कॅनॉलमधीलच पाणी सुरू असून, तेही आता १५ ऑक्टोबर रोजी बंद केले जाणार आहे. मागील अडीच महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात आले असून, समाधानकारक पाऊस झाल्याने ते पाणी नदीच्या दिशेनेच वाहून गेले.

आता पावसाळा संपल्याने धरणातून सोडले जाणारे सर्व पाणी बंद केले जाणार आहे. आगामी आठ महिन्यांचे पाण्याचे नियोजन आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत पहिल्या आवर्तनाचा निर्णय होईल. मार्च-एप्रिलमध्ये दुसरे तर आवश्यकतेनुसार मे महिन्यात शेवटचे आवर्तन सोडले जाऊ शकते. त्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काही दिवसांतच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

पाटस येथील तक्षशिला बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती. कोजागिरी पौर्णिमा निमीत्त सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन. तथागत गौतम बुद्ध मूर्तीची केली स्थापना.

महाराष्ट्र शासन संत सेवालाल महाराज लमाण तांडा योजनेच्या दौंड तालुका अशासकीय सदस्य पदी मिथुन राठोड यांची निवड..

मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दशरथआण्णा कांबळे यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मान....

दौंड पोलीस प्रशासनाचे जाहीर आवाहन. आदर्श आचारसंहितेचे पालन करा. पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा .

अखेर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त शेतकरी श्री आल्हाट यांच्या बांधावर

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील. रावगाव विद्यालयास यशकल्याणीकडून ६ स्मार्ट टि.व्ही.संच प्रदान..!

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

उजनी धरणातून सोडलेले कॅनॉलचे पाणी उद्यापासून बंद! धरणात सध्या 123 TMC पाणी; 15 जानेवारीदरम्यान धरणातून सुटणार शेतीसाठी पहिले आवर्तन

इंदापूर तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या तीन शाखांचे जल्लोषात उद्घाटन

राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ?तुतारी आणि पिपाणी मोठा गोंधळ उडणार ?

आईने कष्टाने घेऊन दिलेली गाडी चोरीला गेली “आईची शेवटची आठवण, प्लीज परत करा..” पुणेकर तरुणाची पाटी पाहून व्हाल भावुक

डोक्यात दगड घालून मित्राचा खून; इंदापूरातील घटना

बारामतीच्या टीसी कॉलेज परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक शाखेचा जोरदार दणका! 84 वाहनांवर कारवाई! पाऊण लाखांचा दंड

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

मुलनिवासी बहुजनांना राष्ट्रीय स्तरावर एकत्र यावे लागेल - कमलकांत काळे राष्ट्रीय अध्यक्ष

पिसोरेखांडच्या नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लीलावती येरकळ यांचा नागवडेंकडून सन्मान