By : Polticalface Team ,02-06-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात महावितरणकडून घरगुती व व्यवसायिकांना मे महिन्याची देण्यात आलेली वीजबिले मुदत संपल्यानंतर ग्राहक व व्यावसायिकांना देण्यात आली होती. परंतु विलंब आकाराची बिले महावितरण कडून वीज ग्राहकांना मिळाल्यामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त करत महावितरण चा सावळा गोंधळ संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी कळवला. याबाबत वृत्तपत्रात ग्राहकांच्या तक्रारी प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या बिलासंदर्भात संबंधित एजन्सीला चांगलेच धारेवर धरल्याची समजते. ग्राहकांच्या तक्रारीनुसार मे महिन्याच्या देयकाची तारीख 19 मे असताना अनेक घरगुती व व्यावसायिक वीजधारकांना बिलाची अंतिम तारीख संपून आठ दिवसानंतर संबंधितांनी वीज बिले वाटप केले. त्यामुळे नाहक अनेक वीज ग्राहक व व्यवसायिकांना 50 ते 100 रुपयापर्यंत दंड भरण्याची वेळ येऊन ठेपली होती. या गंभीर प्रश्न संदर्भात अनेक वीज ग्राहकांनी पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्याकडे महावितरण बाबत तक्रारी केल्या होत्या. पत्रकार कुरुमकर यांनी तातडीने महावितरणचे उपअभियंता श्री इंदुलकर यांच्याशी संपर्क साधून वीज ग्राहकांना मे महिन्याचे विज बिल कोणत्या कारणाने मुदत संपल्यानंतर बिले वाटप केली? असा सवाल उपस्थित केला होता. घरगुती व वीज ग्राहकांना नाहक दंड कशासाठी? असा सवाल केल्यानंतर उपअभियंता इंदुलकर यांनी ज्या वीज ग्राहकांना विलंब देयकाची बिले मिळाले असतील तर त्या वीज ग्राहकांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी. त्या वीज ग्राहकाचा दंड क्षमापित करण्यात येईल व उशिराच्या वीज बिलाचा दंड आम्ही संबंधित एजन्सीच्या नावे टाकू. त्यानुसार अनेक घरगुती वीज ग्राहकांनी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विलंब आकाराच्या दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक वीजधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वीज ग्राहकांच्या म्हणण्यानुसार महावितरण कडून वीज ग्राहकांना दरमहा विजेची बिले पाठवले जातात. वीज ग्राहक देखील प्रामाणिकपणे वीज बिलाचा दंड न होता. तात्काळ वीज बिल बँक; पतसंस्था व फोनपेवर महावितरणचे विजबिल अदा करतात. यावेळेस मात्र महावितरण कंपनीची विजबिले अखेरची भरणा तारीख संपल्यानंतर देण्यात आल्याने वीज ग्राहकांच्या माथी नाहक विलंब दंड भरण्याची वेळ येऊन ठेपली होती. परंतु अनेक वीज ग्राहकांनी पत्रकार कुरुमकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या वीज बिलाचा उलगडा प्रसिद्धीच्या माध्यमातून महावितरणचे निदर्शनास आणून दिला होता. या वृत्ताची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत ज्या वीज ग्राहकांना विलंब भरणा तारीख संपून गेल्यानंतर वीज बिले कुणाला मिळाले असतील तर त्यांनी श्रीगोंदा येथील महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून लेखी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक वीज ग्राहकांनी श्रीगोंदा येथील महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून वीज बिलाचा विलंब दंड कमी करण्याची मोहीम राबवली आहे. ज्या अन्य वीज ग्राहकांना वीज बिल भरणा विलंबानंतर बिले मिळाले असतील तर त्यांनी तातडीने श्रीगोंदा येथील महावितरण कारल्याची संपर्क साधून लेखी कळविण्यात यावे; असे आवाहन देखील महावितरणचे उपअभियंता श्री इंदुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकार कुरुमकर यांनी महावितरणच्या या विलंब बिलाचा प्रश्न योग्य वेळी मार्गी लावल्याबद्दल व्यावसायिक वीज ग्राहक श्री सतीश भगत यांनी पत्रकार कुरुमकर यांचे आभार मानले आहेत.
वाचक क्रमांक :