मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत गाव योजनेचा शुभारंभः - करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन.

By : Polticalface Team ,2025-06-06

मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत  गाव योजनेचा शुभारंभः -  करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक  फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन.

करमाळा प्रतिनिधी
मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांची "विकसित गाव" ही संकल्पनेमध्ये गावातील शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्पातुन आपल्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध करणे, तसेच सेंद्रीय शेती करुन विषमुक्त भाजीपाला, फळे तयार करणे अभिप्रेत आहे. त्यातुन गावची आर्थिक परिस्थीती सुधारुन गाव गुन्हेगारीमुक्त करणे ही संकल्पना आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्हयातील होणाऱ्या चारही वारींना येणाऱ्या वारकऱ्यांना वारी करणे सोपे जावे यासाठी रस्त्याचे कडेला वृक्षारोपण करुन हरीत वारी हा उपक्रम राबविणे आहे. विकसित गाव संकल्पने अंतर्गत करमाळा तालुक्यातील फिसरे, कोर्टी, सरपर्डोह, लिंबेवाडी, रावगाव या गावांची निवड करण्यात आली आहे

मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतुन त्यांनी मौजे फिसरे ता. करमाळा येथे मिशन विकसीत गाव अभियानाअंतर्गत सेंद्रीय शेती, जलतारा प्रकल्प व त्यांचे फायदे तसेच हरीतवारी याबाबत मागदर्शनपर शिबीर आयोजीत करुन फिसरे, ता. करमाळा येथील भरत आवताडे यांचे सेंद्रीय शेतीला भेट देवुन त्या ठिकाणी करमाळा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तसेच शेतीतज्ञ तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांच्या सहकार्याने सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्प यातुन होणारे शारिरीक व मानसिक फायदे तसेच सेंद्रीय शेतीच्या उत्पन्नातुन भविष्यात होणारा फायदा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सदर शिबीरामध्ये मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सेंद्रीय शेतीतील अन्नधान्यापासुन मानसिक व शारिरीक फायदे सांगितले. खेडयांचा विकास झाला तर महाराष्ट्र समृध्द होईल. महाराष्ट्र समृध्द झाला तर संपुर्ण राष्ट्र समृध्द होईल या उक्तीप्रमाणे काम करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये जलतारा प्रकल्पातुन जलसंधारण करण्याचे अवाहन केले. यामध्ये सोलापूर जिल्हयातील प्रथम १०० गावे विकसीत करुन संपुर्ण महाराष्ट्र व देशात रासायनीक शेतीला बगल देवुन सेंद्रीय शेतीतुन कमी खर्चात भरघोस उत्पन्न कशा प्रकारे मिळते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी "सेंद्रीय शेती करा. स्वतःचे आरोग्य आणि उत्पन्न तसेच जमीनीची प्रत वाढवा" असे अवाहन केले. तसेच आयुष्य वाढवायचे असेल तर सेंद्रीय शेती करणे काळाची गरज असल्याचे शेतीतज्ञ तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन भरत आवताडे यांनी केले व सुत्रसंचालन संदीप शिंदे-पाटील, पोलीस पाटील पोथरे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, रणजीत माने व करमाळा पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले. पोलीस विभागाच्या नेहमीच्या कामातुन वेळ काढुन शेतकऱ्यांकरीता शिबीर आयोजीत केले. सदर ठिकाणी भरत आवताडे यांनी सेंद्रीय शेती‌द्वारे उत्पन्न घेतलेली वांगी, आंबा तसेच पालेभाज्या यांची शेत सर्वाना दाखविण्यात आली. त्यांनतर मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी आगामी आषाढी वारीस हरीतवारी संबोधुन प्रमुख पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमाचे तसेच जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites



मढेवडगाव येथे वृक्ष संवर्धन आणि समतेचा संदेश देत गावकऱ्यांनी साजरी केली बकरी ईद..

सावधान! तुमच्या नावावर परक्याचं SIM वापरलं जातंय का? फक्त मोबाईल नंबर टाका… आणि जाणून घ्या किती सिम आहेत तुमच्या नावावर!

प्रभाग रचना विरोधात सर्व पक्षीय बैठक बारामतीत संपन्न — जनआंदोलनाची तयारी

मा. पोलीस अधिक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या विकसीत गाव योजनेचा शुभारंभः - करमाळा तालुक्यातील सहा गावांना घेतले दत्तक फिसरे गावामध्ये सेंद्रीय शेती व जलतारा प्रकल्पाच्या कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक सात जून रोजी बकरी ईद ची नमाज इदगाह मैदानावर आठ वाजता होणार,,,,,,,, कलीम काझी सर

खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का? थांबवत नाही. एसटी वाहक चालकास शिवीगाळ मारहाण केल्या प्रकरणी 7 इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना DBT प्रणाली अंमलात न आल्याने लाभ अडकले; वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

यवत गावची बाजार पेठ उंचावण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून गाव कारभारी यांनी प्रयत्न केला पाहिजे.

राजेंद्र दादा नागवडे व सौ नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून घरकुल प्रकल्पास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

राज्यस्तरीय तबला स्पर्धेत श्रेयस सोनटक्के प्रथम; थायलंडसाठी निवड

वसुंधरा बचाव अभियानचा स्तुत्य उपक्रम* लोणी व्यंकनाथ येथे मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान. , सामाजिक एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उपक्रम

अखेर वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणकडून वीज ग्राहकाचा विलंब दंड संबंधित एजन्सीच्या नावे

हरिश्चंद्र शिंदे यांचे आर एस पी अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण.

डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर गळाभेट

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला