भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा उरुळी कांचन, रमाई महिला मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन भिमनगर यवत त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,08-02-2024

भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा उरुळी कांचन, रमाई महिला मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन भिमनगर यवत   त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.दौंड ता ०७ फेब्रुवारी २०२४, भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे येथील तुपे वस्ती या ठिकाणी रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, त्याच प्रमाणे पंचशील मित्र मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिमनगर यवत ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी रमाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली, उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे तुपे वस्ती येथील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयु. बाबासाहेब कांबळे यांनी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या कार्याची व कर्तुत्वाची महत्वपूर्ण माहिती दिली, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दलातील प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती, बाळासाहेब आवारे, केंद्रीय शिक्षक बी जी घाटे, महेश गायकवाड, जन आधार न्यूज चे पत्रकार अनिल गायकवाड, विशाल गायकवाड, के डी पवार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मा सतिश साळवे, विजय गायकवाड, या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कृतिक भवन भीम नगर यवत ता दौंड जिल्हा पुणे, येथे रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने यवत गावातील ओबीसी प्रवर्गातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे भिम सैनिक, मंगेश रायकर, भरत भुजबळ सारिका ताई भुजबळ, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर, माजी पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड, जनआधार न्यूज चे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, युवा आघाडीचे भिम सैनिक निलेश शेंडगे, तसेच पंचशील मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड, युवा कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, सतीश गायकवाड, गणेश गायकवाड,चंद्रकांत गायकवाड, रवींद्र गायकवाड, हर्षद गायकवाड, सुरज गायकवाड, ऋतिक गायकवाड, मंगेश काळे, जितेंद्र कदम, तसेच भीम नगर येथील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रमाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंतीनिमित्त उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे, येथील तुपे वस्ती येथे कार्यक्रमात प्रमुख प्रवक्त्यांनी रमाई आंबेडकर यांचे बाल पण व वैवाहिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला, प्रमुख मान्यवरांनी बोलताना सांगितले, वनंद गावचे भिक्कु धोत्रे व रुक्मिणी धोत्रे, यांची मोठी मुलगी रमाईचा जन्म ०७ फेब्रुवारी १८९८ साली दाभोळ जवळील वनंद गावात झाला, आई रुक्मिणी संसारी व संस्कारी होती, रमाई वर तीचा फारच जीव होता, आठ वर्षाच्या रमाईला ती सांगत असे, रमा स्वच्छ राहावं, स्वच्छ मनाने जगावं, कष्ट करावं आणि आब्रुनी राहावं, आईचं हे बोलणं रामाच्या कायम लक्षात राहीलं काही दिवसातच रमाच्या माता पिताचे अल्पशा आजाराने निधन झाले, आई वडिलांचे छायाछत्र तिच्या पासून दुरावले, घाकटी बहिण गौरा, व घाकटा भाऊ शंकर आणि नऊ वर्षाच्या रमावर दुःखाचा डोंगर कोसळला, खऱ्या अर्थाने रमा व तिचे दोन भावंड माता पित्याविना पोरकी झाली, परिस्थिती च्या ओघात रमा अल्पवयातच प्रौढ विचाराची झाली होती, दुःख काय असतं हे तिला चांगलंच त्रास देऊन गेलं, या प्रसंगी रमाला व तिच्या भावंडांना वलंकर काकानी आणि गोविंदपुरकर मामाने या तीन भावंडांना मुंबई येथील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला आणले, काकांची परिस्थिती जेमतेम बेताचीच होती, आई-वडिलांचे छत्र हरवलेली मुलं काकांकडे राहू लागली, या कालखंडात सुभेदार रामजी बाबा भिमरावासाठी मुलगी पाहत होते, भायखळ्याला मार्केट जवळ राहणाऱ्या लवंकरांकडे लग्नाची मुलगी आहे, असे रामजी बाबा याना समजले, मुलगी पाहताक्षणी रमा त्यांना पसंत पडली, गरीब घरातील व समजुतदार मुलगी भिमाला करावी असं त्यांना मनापासून वाटत होते, त्या वेळी भिमाचं वय १४ आणि रमाईचं वय ०९ होते, भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये अतिशय साध्या पद्धतीने रमाचं आणि भिमरावाचा लग्न सोहळा पार पडला, भिमराव आई विना पोरका होतो तर रमा आई वडिलांचे छत्र हरवलेली होती, खऱ्या अर्थाने रमाचे हसण्या खेळण्याचे वय होते, पण परिस्थितीने तिला प्रौढत्व आले होते, रमा विचारी व समजूतदार होती, आत्या मीराबाई भीमरावाच्या आवडी निवडी रमाला सांगत असे, भीमराव पुस्तक वेडा आहे, अभ्यासाच्या वेळी त्याला त्रास देऊ नये, असे मिराबाई रमाईला सांगत असे, त्यावेळी समाजातील एकमेव विद्यार्थी भीमराव प्रथम क्रमांकाने मॅट्रिक पास झाल्याने चौकडे आनंद व्यक्त केला जात होता, या प्रसंगी पत्नी रमाईचे काळीज सुपाएवढे झाले होते, पती भिमरावांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमांमध्ये रमाई भारावून गेली होती, कार्यक्रमाचे अध्यक्ष सी के बोले, आणि प्रवक्ते केळुसकर गुरुजी या मान्यवरांच्या मुखातून नवऱ्याचं कौतुक ऐकताना रमाई भारावून गेली होती, पती भीमरावांन बद्दल तीला मोठा अभिमान वाटत असे, भविष्यातील घटनाकार ज्ञानसूर्याची पत्नी आहे, हे रमाला तरी कुठे माहीत होते, कालांतराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात जावे लागले, त्या वेळी रमाईने अनेक संकटांना सामोरे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी माई रमाई ने घरातील महत्वाची जबाबदारी स्वीकारली होती, या विषयावर बोलताना प्रवचनकार पूर्व हवेली (संस्कार उपाध्यक्षा) सुकेशिनी घाटे यांच्या डोळ्यातुन अश्रू अनावर झाले होते, तर उपस्थित महिलांना ही हुंदके फुटत होते, प्रमुख प्रवक्त्यांनी रमाई भिमराव आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला, या प्रसंगी उपस्थित अनुयायी व महिलांना गहिवरून आले होते.

जयंतीच्या निमित्ताने उरुळी कांचन तुपे वस्ती परिसरातील आलेल्या सर्व अनुयायांचे समता सैनिक दलाचे सैनिक सखाराम ओव्हाळ, भिमराव सैनिक, अशोक कांबळे, संतोष मोटे, विलास सांगळे, कैलास शिंदे, परमेश्वर कदम, यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती ताई लोंढे व जया ताई खापडे यांनी केले, या प्रसंगी रमाई महिला मंडळाच्या महिला उपासिका व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते,


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष