बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून १७ वर्षाच्या हर्षदाने गळफास घेऊन केली आत्महत्या राहु येथील घटना.

By : Polticalface Team ,06-05-2025

बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून १७ वर्षाच्या हर्षदाने गळफास घेऊन केली आत्महत्या राहु येथील घटना. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ०६ मे २०२५ दौंड तालुक्यातील मौजे राहु ता दौंड जिल्हा पुणे येथील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील १७ वर्षाच्या हर्षदा बबन पवार या विद्यार्थिनींला बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून या विद्यार्थिनीने. राहू (ता.दौंड) येथील राहत्या घरामध्ये साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना दि ०५/०५/२०२५ रोजी दु ०२.३० वाजे सुमारास घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सदर घटने बाबत यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी बबन महादेव पवार वय ३५ वर्षे व्यवसाय शेती रा राहु सोनवणे मळा ता.दौंड जि.पुणे यांच्या फिर्यादी वरून म.र.नं. १००/२०२५ BNS १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. हर्षदा ही हुशार मुलगी होती ती पुणे येथे शिक्षण घेत होती.इयत्ता दहावीला तिला ८७ टक्के गुण होते. बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून तिला ५५ टक्के गुण मिळाल्यामुळे ती नाराज होती. तिचे आई वडील राहू परीसरात मोलमजुरी करतात. ते कामा निमित्त बाहेर गेले होते. तर आजी आजोबा हे परगावी पाहुण्याकडे गेले होते. दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाल्या नंतर तिला या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असल्यामुळे तिने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या वेळी तिचा लहान भाऊ घराच्या बाहेर होता दुपारी वडील घरी आल्या नंतर ही हर्षदा बराच वेळ दार उघडत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनीं खिडकीतून पाहिले असता धक्काच बसला. हर्षदाने घराचे छताचे लोखंडी चॅनलला साडीचे साहाय्याने गळफास घेतला हे पाहताच तत्काळ दरवाजा तोडला आणि समोरील दृश्य पाहून टाहो फोडला सिनर्जी हॉस्पीटल राहू ता दौंड येथे घेवून गेले तेव्हा डॉक्टरांनी तिला तपासून पाहिले असता हर्षदा मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नुकतेच जाहीर झाले असलेल्या बारावीचे निकालामध्ये हर्षदाला गुण कमी पडले म्हणून काय झालं ? कोणी असं करतं का ? अपयशाने खचून न जाता भविष्यातील अनेक उज्वल संधीकडे सर्व विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष