पेडगावच्या बहादूरगड उर्फ धर्मवीरगडावर आधारीत पहिले वहिले साहित्य प्रकाशित झाले
By : Polticalface Team ,Thu May 19 2022 20:59:32 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: दि. ३० मार्च २०२२ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगड उर्फ धर्मवीरगडावर पेडगावचा धर्मवीरगड एक ऐतिहासिक शौर्यतीर्थ.. या महत्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या गडावरील स्वतंत्र असे हे पहिलेच साहित्य प्रकाशित झाले आहे.
या ऐंशी पानांच्या पुस्तकाचे लेखन पेडगावचाच रहिवासी असणाऱ्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील एस. वाय. बी. ए. मध्ये शिकणाऱ्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार कृष्णा भगवान घोलप या तरुणाने केले आहे. पेडगाव ते वढू - तुळापूर जाणाऱ्या शक्तीज्योत शौर्य यात्रेनिमित्त, गडावरील शंभू राज्यांच्या शौर्य स्तंभाचे प्रतिवर्षी शासकीय पूजन होते.
या वर्षीच्या शासकीय पूजन कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन श्रीगोंद्याचे तहसिलदार मा. श्री. मिलिंद कुलथे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या ग्रंथास इतिहासतज्ञ प्रा. डॉ. नारायण गवळी यांची प्रस्तावना आहे. तसेच अभिप्राय, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचा आहे. अनुराधा प्रकाशन, शेवगाव हे प्रकाशक आहेत. भीमा - स्वरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेल्या या किल्याची भौतिक माहिती व संक्षिप्त इतिहास, नवोदित लेखक कृष्णा घोलप यांनी ललितलेखनाच्या माध्यमातून मांडण्याचा पहिला आणि यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल उपस्थित सर्व शासकीय अधिकारी व मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच पुस्तकालाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.
या प्रसंगी, श्रीगोंद्याचे तहसिलदार मा. श्री. मिलिंद कुलथे साहेब, पेडगावच्या सरपंच सौ. सुलोचनाताई भगवान (आप्पा) कणसे ,उपसरपंच सौ. पूज्या नारायण कणसे, इतिहासतज्ञ प्रा. डॉ. नारायण गवळी, प्राचार्य डॉ. सूर्यवंशी सर, माजी पोलिस जमादार, श्री. ज्ञानदेव चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक, श्री. सुनील सूर्यवंशी, आरोग्याधिकारी श्री. नितीन खामकर साहेब, श्री. जगताप साहेब, प्रा. श्री सागर पवार (व्याख्याते), श्री. लक्ष्मण नायकवाडी (व्याख्याते), श्री. दत्तात्रय सस्ते सर, श्री. भर्तरी भागवत गुरुजी, पत्रकार शफिक हवालदार, भूमि अभिलेख अधिकारी, पुरातत्व विभागाचे रखवालदार, श्री. मश्चीन्द्र पंडित, भाऊ घोडके (गडपाल ), नंदकिशोर क्षीरसागर (गडपाल) इत्यादी शासकीय अधिकारी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. दत्तात्रय सस्ते सरांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन पेडगावचे सरपंच श्री. भगवान अप्पा कणसे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी