आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल.
By : Polticalface Team ,Tue Sep 20 2022 20:17:50 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे बेलवंडी स्टेशन ता.श्रीगोंदा येथील गट नं. 451 मधील 40 आरक्षेत्र ही महाराष्ट्र शासनाचे असून जमीन आदिवासी विकास प्रकल्प राजुर यांच्या नावे तात्काळ करण्यात यावी व तेथे आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधून देण्यात यावे व श्रीगोंदा बायपास चौक येथील राहणाऱ्या लोकांचे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियम कुल करून सातबारा नोंद करण्यात यावी व गायरान गावठाण निवासी करण्यासाठी केलेले अतिक्रमण नोंद करून मालकी हक्क द्यावा तसेच घरकुल व जातीचे दाखले आधार कार्ड कॅम्पद्वारे मिळावे तसेच आदिवासी पारधी समाजाला तातडीने दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण सर, आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, फासेपारधी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित भोसले, आदिवासी समाज विकास संस्था अध्यक्ष राहुल भोसले, अँड.योगेश गुंजाळ, महिला श्रीगोंदा तालुका अध्यक्ष छाया भोसले, आदिवासी समाज विकास संस्था उपाध्यक्ष सुरेंद्र काळे, लोक अधिकार आंदोलन संघटनेचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पवार, रामसिंग भोसले, सावकार भोसले, जयश्री काळे, लक्ष्मण मोरे, रवींद्र भोसले, सुखाली भोसले, दीपक काळे, सुरेश काळे, गयाबाई पवार, फुलचंद चव्हाण आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. बेलवंडी येथील महाराष्ट्र शासनाचे 40 आर जमीन आदिवासी विकास प्रकल्प यांच्या नावे करून आदिवासी पारधी समाजाला सांस्कृतिक भवन उभारून देण्याची मागणी.
आदिवासी पारधी समाजासाठी बेलवंडी स्टेशन येथे महाराष्ट्र शासनाचे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर ता.अकोले यांनी गट नं. 451 मध्ये 40 आर या महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या क्षेत्रांमध्ये आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असल्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत शाखा यांना लेखी कळविले आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे नावे गट नं. 451 मधील 40 आरक्षेत्र नावे करण्याबाबत ग्रामपंचायत बेलवंडी बु यांनी 11 डिसेंबर 2018 रोजी ग्रामसभा ठराव घेण्यात आला. हे भवन मिळण्यासाठी बेलवंडी ग्रामपंचायतचा ठराव झाल्यानंतर सर्व विभागाच्या वन विभाग, महसूल जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर पंचायत व इतर विभागाच्या एनओसी घेतल्या नंतर भूमी अभिलेख श्रीगोंदा यांच्यामार्फत सदर जागेची मोजणी झाली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात महसूल विभागात जमा केलेली आहे. कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर ग्रामपंचायत शाखा यांना त्यांचा अभिप्राय मागितला सुरुवातीला ग्रामपंचायत ने ठराव दिला होता. परंतु गावातील राजकारणामुळे आता ते त्यांच्या अभिप्राय देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांनी सांगितले की गट नं. 451 चा अवतीभवती असलेल्या इतर व्यक्तींच्या सह्या संमती घ्यावी त्यानुसार सदर जमिनीवर असलेल्या इतर व्यक्तींनी सह्या संमती दिले व ती आम्ही ग्रामपंचायत जमा देखील केले आहे. तरीदेखील बेलवंडी येथील सरपंच व ग्रामसेवक व गावकरी पुढारी हे या कामास टाळाटाळ करीत आहे. व त्यामुळे सदर कामास सुरुवातच झालेली नसून महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या 40 आर क्षेत्र प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर ता.अकोले यांचे नावे करण्याची मागणी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.