ठाकरे गटाला धक्का! पक्षचिन्हाबाबात निर्णय निवडणूक आयोग ठरवणार

By : Polticalface Team ,Tue Sep 27 2022 17:13:59 GMT+0530 (India Standard Time)

ठाकरे गटाला धक्का! पक्षचिन्हाबाबात निर्णय निवडणूक आयोग ठरवणार मुंबई : आज कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शिंदे गटाला दिलासा तर ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देते? कधी निर्णय देते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

आता धनुष्यबाण हे चिन्ह टिकवण्यासाठी ठाकरे गटाची सर्व लढाई निवडणूक आयोगाच्या दारात येऊन ठेपली आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती. ठाकरे गटाची हीच मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आज सर्वात अगोदर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी घटनापीठापुढे युक्तिवाद केला. त्यानंतर ​​​​​​शिंदे गट, निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करण्यात आला.

शिंदे गट 19 जुलैला निवडणूक आयोगात गेला. मात्र शिंदे गट कोणत्या भूमिकने, कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगात गेला? विधीमंडळ पक्षाचा सदस्य की, राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून? शिंदेंचं सध्याचं स्टेटसं काय? शिंदेच्या सदस्यत्वार प्रश्न असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी केला.

संख्याबळ नसताना शिवसेनेने व्हीप बजावला. बहुमत नसताना एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवले गेले, मात्र असे करता येत नाही. त्यामुळे शिंदे गटाला दिलेली अपात्रतेची नोटीस वैध नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाच्यावतीने अ‌ॅड. निरज कौल यांनी केला.

अ‌ॅड. अरविंद दातार यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडली. दातार म्हणाले, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून आमचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत नाही.

राज्यपालांची बाजू अ‌ॅड. तुषार मेहता यांनी मांडली. मेहता म्हणाले, कोणती शिवसेना खरी याचे उत्तर आयोगाला द्यायचे आहे. आयोगाला त्यांचे काम करु दिले पाहीजे. पक्ष व चिन्हाबाबत निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला द्यावी

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.