अतिवृष्टी झालेल्या पिक नुकसानी बाबत त्वरित भरपाई मिळावी - माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी

By : Polticalface Team ,Fri Oct 14 2022 18:10:42 GMT+0530 (India Standard Time)

अतिवृष्टी झालेल्या पिक नुकसानी बाबत त्वरित भरपाई मिळावी - माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानी बाबत भरपाई मिळावी म्हणून आता माजी आमदार नारायण पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन सादर केले. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावांना अविरत होत असलेल्या पावसाचा व अतिवृष्टीचा फटका बसला असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावातील पिके तर सोडाच पण शेतीही वाहुन गेल्याने शेतकऱ्यांचे भविष्य सुद्धा धोक्यात आले आहे.बांध व शेतातील गाळपेरीची सकस माती वाहून गेल्याने आता आगामी पाच दहा वर्षांत सुद्धा शेती पुर्ववत करणे सरद शेतकऱ्याला अशक्य आहे. अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. केळी सारख्या जीवापाड जोपासललेल्या व कर्ज काढून पिके वाढण्यास खर्च केलेल्या बागांचेही आता अतिवृष्टी मुळे नुकसान झाले. तसेच शेती शिवाय भाजीपाला व फलोत्पादन व्यावसाय सुद्धा धोक्यात आला आहे. शेती नुकसानी शिवाय घरांची झालेली पडझड व वाहून गेलेले रस्ते आणि छोटे पुल यांचेही नुकसान झाले आहे. याचा दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी विद्युत पोल व तारा पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. आपण ही सर्व परिस्थिती गंभीरतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समोर तपशीलवार माहिती नुसार मांडली आहे.यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागास करमाळा मतदार संघातील अतिवृष्टी नुकसानीची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मग शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी आपली अपेक्षा असून लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांतील फटका बसलेल्या पिके, घरे, फळबागा, रस्ते आदिंचे तात्काळ पंचनामे होऊन योगा ती नुकसान भरपाई मिळेल यासाठी आपण आशावादी असल्याचेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तसेच याबाबतचा आपला पाठपुरावा चालूच राहणार असून यापूर्वी आपण जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन त्यांना परिस्थिती बाबत सांगितले असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.