By : Polticalface Team ,Thu Oct 27 2022 08:47:53 GMT+0530 (India Standard Time)
व्याख्यानातून आपले विचार व्यक्त करताना सिताराम काकडे यांनी नमूद केले की, माता भगिनी प्रत्येक क्षेत्रात आहेत, त्यांना कोणते क्षेत्र वर्ज नाही. स्त्रियांच्या हातात जग गेलं तर, जगाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे सामर्थ्य माता-भगिनी मध्ये आहे. इतिहासात जिजाऊ अहिल्या आणि सावित्रीने ते सिद्ध करून दाखवलं आहे. एक स्त्री इतिहास घडू शकते जिजाऊने शिवाजींना जन्म दिला आणि शिवाजींनी इतिहास घडवला. पुढे बोलताना ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशात जर शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता तर, आम्ही हॅरी पॉटरच्या कथा सांगण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या कथा जगाला सांगितल्या असत्या. यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली तसेच विविध संतांचे दाखले देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे आयोजक घन:श्याम शेलार यांच्या विषयी बोलताना काकडे म्हणाले की, जर घन:श्याम शेलार या तालुक्याचे आमदार झाले असते तर, त्यांच्यावर देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी मोठी जबाबदारी दिली असती.जेणेकरून या जिल्ह्यासह तालुक्याचे भले झाले असते. कुकडीचे पाणी तालुक्यात येण्यामागे अण्णाचें मोठे कष्ट आहे. असेही काकडे यावेळी म्हणाले. आई वडिलांच्या कार्यकर्तुत्वाचा आलेख सांगणाऱ्या वेगवेगळ्या कविता आणि त्यांचे कृतज्ञता नमूद करणारे अनेक गीत व काव्य काकडे यांनी यावेळी उपस्थितां समोर मांडले. बहिणाबाईंच्या कवितेतून त्यांनी आई, वडील व बहिणी विषयी मांडलेल्या कवितांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना गुजरातचे जीएसटी आयुक्त शिवाजीराव डांगे यांनी विचार व्यक्त केले की, बळीराजा ही संकल्पनाच अशी होती की, अगदी वैदिक संस्कृतीच्या आधी तसेच रामायण महाभारताच्या पुर्वी असलेल्या संस्कृतीमध्ये बळीला स्थान होतं. कृषक समाजाचा राजा म्हणजे बळीराजा होय. आयोजित कार्यक्रमाच्या संदर्भात बोलताना डांगे म्हणाले की, अण्णांनी अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. वडाळी गावच्या माता भगिनीं ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आल्या. व्याख्याते सिताराम काकडे यांच्या व्याख्यानातील आई-वडिलांविषयीचा संदर्भ देत आई वडिलांविषयी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. दोन महिन्यापूर्वी आईचे छत्र हरपलं मात्र, ही पोकळी कमी करण्याचे काम बऱ्याच प्रमाणात आपलं गाव आपली मातृभूमी करते असे विचार यावेळेस त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजक घन:श्याम शेलार यांनी आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, सर्वत्र पुण्यस्मरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र, माणूस हयात असताना केलेला त्यांचा गुणगौरव हा त्यांना वेगळाच आनंद देणारा असतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आयुष्याच्या शेवटपर्यंत राहतो व ते आशीर्वाद देतात. पुढें बोलतांना म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत साधारण ३०-३५ वर्ष राजकारणात टिकणे अवघड गोष्ट आहे. मात्र, तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादामुळे आणि पाठबळामुळे मी आजपर्यंत राजकारणात आहे. यश अपयशाची परवा न करता प्रत्येकाला सकारात्मक दृष्टीने सहकार्य केले आहे. असेही ते म्हणाले. आयोजित केलेल्या भाऊबीज कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या गावातील सर्व मुलींना त्यांच्या मैत्रिणींना संबंधितांना या निमित्ताने भेटता आले याचा मोठा आनंद होत असलेले त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पाटील भोसले यांनी केले. तर, सूत्रसंचालन बापू गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे दीपकराजे शिर्के, भाऊसाहेब इथापे, एडवोकेट विठ्ठल काकडे, अंबादास गारुडकर, बाळासाहेब शेलार, माऊली दळवी, हभप सयाजी महाराज, रानीताई झेंडे, गोविंद जठार, निर्मला ताई नागवडे, सौ, घोलप ताई, लोटके सर, मोहन भिंताडे, सरपंच सौ, सकट ताई, मिनल ताई भिंताडे, मुकुंद सोनटक्के, प्रकाश निंभोरे, संजय आनंदकर, भाऊसाहेब शिंदे सह वडाळी, सुरुडी गावातील माता, भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---आप्पा चव्हाण वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न