उड्डाणपुलाचे काम का रखडले होते? आमदार जगताप म्हणाले

By : Polticalface Team ,Tue Nov 01 2022 21:27:08 GMT+0530 (India Standard Time)

उड्डाणपुलाचे काम का रखडले होते? आमदार जगताप म्हणाले अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरात उड्डाणपूल झाला पाहिजे अशी नगरकरांची मागणी होती. अखेरीस नगर शहराचा मानबिंदू ठरणाऱ्या या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच नगरकांना या उड्डाणपुलावरून ये-जा करता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. नगर शहरातील उड्डाणपूल पूर्णत्वास आला आहे. केवळ किरकोळ रंगरंगोटीचे काम प्रलंबित आहे. दरम्यान आज पुलाच्या या कामाची पाहणी भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, पुणे - नगर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु होते तेव्हाच उड्डाणपुलाचे काम व्हावे हे प्रस्तावित होते. काहीतांत्रिक अडचणी असल्याने हे काम झाले नाही. अनेकवेळा याचे भुमिपुजनाचे काम झाले मात्र काम काही सुरु झाले नाही. मात्र आता प्रत्यक्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलाच्या कामामध्ये खासदार सुजय विखे यांचा पाठपुरावा देखील मिळाला. केंद्र सरकारच्या माध्यमातून हे एक मोठं काम झालेले आहे. यामुळे नगरकर समाधान व्यक्त करत आहे. या कामामध्ये प्रामुख्याने नगरकरांचे सहकार्य देखील लाभले आहे, असे आमदार जगताप म्हणाले. दरम्यान या उड्डाणपुलाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १९ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच 20 नोव्हेंबरपासून नगरकरांसाठी हा उड्डाणपूल खुला होईल
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.