उड्डाणपुलाचे काम का रखडले होते? आमदार जगताप म्हणाले
By : Polticalface Team ,Tue Nov 01 2022 21:27:08 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरात उड्डाणपूल झाला पाहिजे अशी नगरकरांची मागणी होती. अखेरीस नगर शहराचा मानबिंदू ठरणाऱ्या या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच नगरकांना या उड्डाणपुलावरून ये-जा करता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
नगर शहरातील उड्डाणपूल पूर्णत्वास आला आहे. केवळ किरकोळ रंगरंगोटीचे काम प्रलंबित आहे. दरम्यान आज पुलाच्या या कामाची पाहणी भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली.
यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, पुणे - नगर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु होते तेव्हाच उड्डाणपुलाचे काम व्हावे हे प्रस्तावित होते. काहीतांत्रिक अडचणी असल्याने हे काम झाले नाही. अनेकवेळा याचे भुमिपुजनाचे काम झाले मात्र काम काही सुरु झाले नाही. मात्र आता प्रत्यक्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.
उड्डाणपुलाच्या कामामध्ये खासदार सुजय विखे यांचा पाठपुरावा देखील मिळाला. केंद्र सरकारच्या माध्यमातून हे एक मोठं काम झालेले आहे. यामुळे नगरकर समाधान व्यक्त करत आहे. या कामामध्ये प्रामुख्याने नगरकरांचे सहकार्य देखील लाभले आहे, असे आमदार जगताप म्हणाले.
दरम्यान या उड्डाणपुलाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १९ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच 20 नोव्हेंबरपासून नगरकरांसाठी हा उड्डाणपूल खुला होईल
वाचक क्रमांक :