By : Polticalface Team ,08-11-2022
साखर आयुक्तालयाला या बाबतचे परिपत्रक काढायचे आहे. त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर संकुलवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी स्वाभिमानी संघटनेने उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी साखर आयुक्तालयाकडे आणि वैध मापन विभागाकडे पाठपुरावा केला. त्यादृष्टीने वैध मापन विभागाकडून एक प्रकारे स्वाभिमानीची मागणी मान्य झाली आहे.
शेतकर्यांनी खासगी वजन काट्यावर वजन करून नेलेला ऊस स्वीकारण्यास साखर कारखाने नकार देतात. त्यावरून कारखाने आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये वाद होतात. तशा तक्रारी वैध मापन शास्त्र विभागाकडे होतात. आता मात्र झालेल्या तक्रारीची दखल वैध मापन शास्त्र विभागाने घेतलीय. खासगी वजन काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखान्यांकडून नाकारणे ही अनुचित प्रथा ठरेल, असे स्पष्ट पत्र वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी साखर आयुक्तालयाला पाठविले आहे.
वैध मापन शास्त्र विभागातर्फे साखर कारखाने व खासगी वजन काट्यांची पडताळणी करून ते प्रमाणित केले जातात. त्यासाठी वैध मापन शास्त्र नियमानुसार एकसमान कार्यपद्धती अवलंबिण्यात येते, असेही या पत्रात नमूद आहे. त्यामुळे शेतकर्यांनी खासगी वजन काट्यावर मोजलेला ऊस आता साखर कारखान्यांना नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आंदोलनस्थळी येत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खासगी वजन काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखान्यांना नाकारता येणार नसून, याबाबत साखर कारखान्यांना सूचना देण्यासाठी परिपत्रक काढणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे वाचक क्रमांक :