बावनकुळेंच्या जादुटोण्याच्या विधानाला संजय राऊतांचं उत्तर, आंबेडकर-ठाकरे एकत्र येण्याचे सुतोवाच..
By : Polticalface Team ,11-11-2022
मुंबई : शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष आकर्षित करणे हे जर भाजपच्या नेत्याचे काम झाले असेल, तर याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर, कार्यावर उभे नाहीत, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या जादुटोण्याच्या विधानाचा समाचार घेतला.
राऊत म्हणाले, आमच्यावरती चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी थांबवायला पाहिजे. शरद पवार, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे प्रमुख नेते असल्याने भान त्यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांनी ठेवायला हवे. आपण त्यांच्यावर चिखलफेक करताय. आपल्याकडे अमर्याद सत्ता आहे. म्हणून तुम्ही अशी विधाने करणार असाल आमच्या नेतृत्वावर. त्यांचे विधान मला माहिती नाही, पण अशी विधाने कोणीही करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
अटकेच्या कारवाईवरून विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलतात राऊत म्हणाले, ज्यांना मला उत्तर देता येता येत नव्हतं. म्हणून त्यांनी मला 100 दिवस तुरूंगात डांबलं. हे 12 खासदारांनी सांगितलं ते बरं केलं. गेली दोन दिवस मी कटुता विसरावी हे बोलतोय, ते ही त्यांना पटत नाही का. अशा प्रकारच्या भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्र कळला नाही. त्यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत. यशवंतराव चव्हाण कळले नाहीत. या महाराष्ट्राची परंपरा काय आहे. तुम्ही माझ्याशी काय लढताय, शिवसेनेशी लढा, असं आव्हानही त्यांनी दिले.
आंबेडकर-ठाकरे एकत्र येईल असे सुतोवाच देखील राऊतांनी केले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांविषयी माझ्या मनात सदैव आदर राहिलेला आहे. आंबेडकर ही एक ताकद आहे. ठाकरे ही एक ताकद आहे. ही ताकद जेव्हा एकत्र येईल, तेव्हा महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणाचे चित्र तुम्हाला बदलेले दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले, पक्षाच्या बैठका सुरू असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. भविष्यात शिवसेना महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदीने उसळी घेईल असे वातावरण मी पाहतो आहे, असा आशावाद देखील राऊतांनी व्यक्त केला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी