रमजानुल मुबारक - ६ ,भावनांची जाणीव होण्याचा काळ

By : Polticalface Team ,29-03-2023

रमजानुल मुबारक - ६

,भावनांची जाणीव होण्याचा काळ रमजानुल मुबारक - ६
*भावनांची जाणीव होण्याचा काळ*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिन्यात केले जाणारे प्रत्येक कार्य हे एकीकडे पुण्य प्राप्तीचा आनंद देत असतांना दुसरीकडे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देखील देत असते. उदार अंत:करणाने लोक रमजान महिन्यामध्ये दानधर्म करतात.वस्तू वाटप करतात.गरजूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होतो.यातूनच मानवतेच्या मूल्यांची जोपासना होते. रमजानचा रोजा धरल्याने तहान,भूक याची जाणीव व्यक्तीच्या ठायी निर्माण होते.जिथे पाणी मिळत नसेल तेथील लोकांची तहान कशी भागत असेल याची कल्पना रोज्यामुळे निर्माण होते.ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही ते आपली भूक कशा पद्धतीने भागवत असतील याची जाणीव भूक लागल्यावर होते.त्याचबरोबर सुदृढ शरीरासाठी उपवास करणे अर्थात भुकेले राहणे सुद्धा आवश्यक आहे ही बाब सुद्धा प्रकर्षाने आपल्या निदर्शनास येते. हजरत पैगंबर यांनी म्हटले आहे कि पोटभर खाऊ नका.शरीराचा एक तृतीयांश भाग अन्न, एक तृतीयांश भाग पाणी आणि एक तृतीयांश भाग रिकामा ठेवावा. तुम्ही कधी ही आजारी पडणार नाहीत. इस्लाम धर्माने एकमेकांच्या भावना जाणून घेण्याला खूप महत्त्व दिले आहे.जेव्हा आपण रोजा धरतो, त्यातून भुकेची जाणीव निर्माण होते आणि ज्यांच्या घरात कधी कधी खायला काही नसतं असे लोक आपली गुजराण कशा पद्धतीने करत असतील याची जाणीव या रोज्यामुळे निर्माण होते.अशा घटकांची मदत करण्याची भावना व्यक्तीमध्ये वाढीस लागते. हाच रोजाचा महत्त्वाचा उद्देश आहे. गरजूंना मदत केल्याने त्यांच्या गरजा पूर्ण होतात. आपल्याला देखील एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते.आपल्या उत्पन्नावर फक्त आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा हक्क नाही तर,समाजातील असे गोरगरीब,गरजू लोक, मुके प्राणी,पक्षी यांचा देखील हक्क आहे आणि तो आपण आदा केला पाहिजे ही प्रामुख्याने इस्लाम धर्माची शिकवण आहे.तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्नदान केले पाहिजे.ही प्रथा जगामध्ये पूर्वीपासूनच आहे.तिचा स्वीकार करून आपणही आपल्या परीने शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न अशा घटकांना केला पाहिजे. ही जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम रमजान महिन्यात होत असते.म्हणून हा महिना गमख्वारी अर्थात दु:ख वाटून घेउन मदत करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो.(क्रमशः) **********************

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी