करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्ताच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षित करा पाटील गटाकडून प्रशासनाला विनंती

By : Polticalface Team ,24-05-2023

करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्ताच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षित करा पाटील गटाकडून प्रशासनाला विनंती करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा-माढा तालूक्यातील शेतकऱ्याची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षीत करा अशी विनंती पाटील गटाकडून प्रशासनास करण्यात आली आहे. याबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सविस्तरपणे भुमिका मांडली. यावेळी तळेकर यांनी सांगितले की सध्या उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे चालू आहे. या पाण्याचे मोजमाप व नियोजन याचा अभाव असल्याने भरमसाठ पाणी सोडले जाते. याचा फटका करमाळा तालुक्यातील व माढा तालुक्यातील बोगद्यावरील शेतकऱ्यांना बसतो. उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील गावे पाण्याखाली गेली. लवादाने धरणग्रस्तांसाठी दोन टिएमसी पाणी राखून ठेवले. पण उजनी गाळयुक्त असल्याने धरणग्रस्तांचे अधिकार त्यांना मिळवून दिले जात नाहीत. सोलापुर शहरास पिण्याच्या नावाखाली पाणी सोडले जाते, आषाढी व कार्तिकी वारी नजरेसमोर ठेऊनही नदीपात्रात पाणी सोडले जाते. पण याचे प्रमाण अधिक असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. दरवर्षी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना विनवणी करते.धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांना रस्त्यावर उतरावे लागते. कारण पाणीपातळी खाली गेल्यास पाईप टाकणे, चारी खांदून पाण्यापर्यंत पोहचणे, प्रत्यक्ष पाण्यापर्यंत वीजेचे पोल उभारणे या गोष्टीचा अनावश्यक खर्च धरणग्रस्तांचे माथी पडतो. माढा तालुक्यातील बोगदाकाठी हीच परिस्थिती निर्माण होते. एवढे होऊनही महावितरणकडून वीजपुरवठा दोन तासावर आणला जातो. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा निघावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. आजमितीस करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना, धरणग्रस्तांचा उजनी पट्टा व सीना-भीमा जोडकालवा अर्थात बोगदा यावरील शेतकरी हा ऊस व खास करून केळी सारखी नगदी पिके घेत आहेत. पाण्याची मागणी भरपुर आहे. अशात उजनीतुन खाली नदीपात्रात जाणारे पाणी थांबले नाही तर शेकडो कोटी रुपयांची पिके धोक्यात येतील. यामुळे मग शेतकऱ्याची बाजू घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेळप्रसंगी आंदोलन करावयाची वेळ आली तरी पाटील गट यास तयार असेल. उजनीच्या पाणी नियोजन समितीत धरणग्रस्तांचा एक प्रतिनिधी असावा, पाणी पातळी खाली गेल्यास प्रत्यक्ष पाण्यापर्यंत शेतकऱ्याला शासनाकडून मोफत वीजेचे पोल टाकले जावेत व तारा ओढून दिल्या जाव्यात ही मागणी यापूर्वीच माजी आमदार नारायण पाटील यांनी केली असून याचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल

उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर पायथ्याला सापडला पुरुषाचा जळालेला मृतदेह. अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल

कु-हाडीने डोक्यात व गळ्यावर गंभीर दुखापत करुन खुन. गिरीम गाव हद्दीतील धक्कादायक घटना दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मागणीला यश : अंत्यविधी वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बारामती नगर परिषदेचे आभार

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंचा ब्राझील अभ्यास दौरा यशस्वी सभासद; कामगार व संचालक मंडळाकडून भव्य सन्मान

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी मदतनिसांचा येत्या शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी होणार सन्मान,,,,,, श्रीमती प्रमिला जाधव यांची माहिती

दहिगाव उपसा व सीना माढा जोडकालव्यातुन उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार :,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहती

श्रीगोंदा-नगर मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या सोळा ग्रामपंचायतींना दिला जाणार “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार” :- आमदार विक्रम पाचपुते

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.