नवीन कांदा निर्यात नाहीच - अनिल घनवट

By : Polticalface Team ,28-04-2024

नवीन कांदा निर्यात नाहीच - अनिल घनवट

लिंपणगाव प्रतिनिधी :

      केंद्र शासनाने कांदा निर्यात सुरू करणार असल्याची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. कांदा उत्पादकांनी नाराजी दूर करून मते मिळवण्यासाठी मोदी सरकारचा हा कुटील डाव आहे असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

          गुजरातमधून पांढरा कांदा निर्यात करण्याचा निर्णय झाल्या नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक नाराज झाले होते. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होऊ नये म्हणून केंद्र शासनाने ९९,१५० टन कांदा निर्यात करणार असल्याची खोटी माहिती प्रसारित केली आहे. प्रत्यक्षात एप्रिल २०२३ पासून आता पर्यंत विविध देशांना निर्यात केलेल्या कांद्याची ही एकूण बेरीज आहे. नवीन कांदा निर्याती बाबत कोणता ही आदेश नाही. हा निर्यात होणार कांदा शेतकऱ्यानं कडून खरेदी होत नाही. या निर्यातीसाठी टेंडर काढले जाते तसेच एन सी ई एल मार्फत निर्यात केला जात आहे. 


*पांढऱ्या कांद्याचा काळा बाजार*

       गुजरात मधील काही कांदा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पांढरा कांदा खरेदी करून ठेवला होता परंतू निर्यात बंदी असल्यामुळे कांदा निर्यात होऊ शकत नव्हता. केंद्र सरकारात सलोख्याचे संबंध असलेल्या काही व्यापाऱ्यांनी तोडपाणी करून निर्यातीची परवानगी मिळवली व परवानगीचे अध्यादेश मिळताच, एकाच दिवसात पूर्ण कांदा बोटीवर चढवून रवाना करण्यात आला.


*कांदा तस्करी जोरात*        

          गुजरात मधल्या बंदरा वरून मोठ्या प्रमाणात कांद्याची तस्करी सुरू असल्याचे ही बोलले जात आहे. १५ रुपये किलो ने खरेदी केलेला कांदा फार तर २५ रुपये किलो प्रमाणे अखती देशात पोहोचतो. तेथे ८० रुपयाच्या दरम्यान दर मिळत असल्याने तस्करांची मोठी कमाई होत आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी दिशाभूल

       निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर पडले आहेत हे सर्वांना माहीत आहे. कांदा उत्पादक नाराज आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी कांदा उत्पादकांची दिशाभूल केली जात आहे. नवीन कांदा निर्यातीसाठी कोणताही आदेश पारित केलेला नाही. कांदा पट्ट्यात सध्या निवडणूक प्रचार सुरू होत आहे. मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकारने प्रसार माध्यमांद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. ही शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल आहे. 


*मतदान करताना विचार करावा*

       कांदा उत्पादकांच्या गरिबीला, कर्जाला व दुरावस्थेला मोदी सरकारचे निर्णय जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी मतदान करताना याचा विचार करून मतदान करावे. शेतकरीविरोधी सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक सुद्धा सरकार पडू शकतो हे दाखवून देण्याची वेळ आली आहे असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

२८/०४/२०२४

अनिल घनवट 

राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.