भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण टिकते...चिखलठाण येथील कुगाव ते जेऊर रस्ता भूमिपूजन प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन

By : Polticalface Team ,29-07-2024

भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण टिकते...चिखलठाण येथील कुगाव ते जेऊर रस्ता भूमिपूजन प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन

करमाळा प्रतिनिधी 

          विकास ही चिंतन चालणारी प्रक्रिया आहे. चालू पंचवार्षिक मध्ये सरकार स्थापन व्हायला लागलेला वेळ, कोविड तसेच सरकारची पाडापाडी असा काळ वजा जाता फक्त 24 महिन्यांचा काळ तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी मला मिळाला. या 24 महिन्यात जवळपास 2500 कोटी रुपयांची विकास कामे आपण केली.हेच विकासाचे राजकारण भविष्यात टिकणारे असते.मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण भविष्यकाळात टिकणार आहे असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी बहुचर्चित मौजे - चिखलठाण नं.1 येथे कुगांव- चिखलठाण - शेटफळ - जेऊर प्रजिमा 11 या 13 कोटी 50 लाख रुपये निधी च्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मा.सौ. सुनिता पाटील मॅडम,उप अभियंता मा.उबाळे साहेब,चिखलठाण गावचे माजी सरपंच मा.चंद्रकांत काका सरडे, माजी जि.प.उपाध्यक्ष,मा.राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मा.बाळकृष्ण भाऊ सोनवणे,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.सुनिलबापू सावंत,लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील, महाराष्ट्र केसरी पै.मा.चंद्रहासबापू निमगीरे,वाशिंबे गावचे सरपंच मा.तानाजीबापू झोळ आदी उपस्थित होते.

           पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, 2014 पासून या रस्त्याची मागणी केली जात होती. आता हा रस्ता पूर्ण होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार हे काम होत असल्याने 15 ते 20 दिवसात हा रस्ता पूर्ण होईल. मध्यंतरी सरकार अस्थिर होते त्यामुळे या कामाला उशीर झाला. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय काम करता येत नव्हते. आता हे काम पूर्ण होणार आहे.तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे मी पूर्ण करत आहे. 5 वर्षात विकासाची सगळीच प्रक्रिया पूर्ण होत नसते.मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा जो पाठपुरावा करणे आवश्यक असते ते काम मी करत आहे. त्यातूनच दहिगावसाठी सर्वात जास्त निधी आणला. डिकसळ पुलाचे कामही मी पूर्ण करत आहे. राजकारण हे विकास कामावरच टिकत असते ते कोणाच्या पुण्याईने टिकत नसते .टेंभुर्णी- जातेगाव हे काम देखील लवकरच सुरु होणार आहे.चिखलठाण ते जेऊर या रस्त्याचे काम अत्याधुनिक पद्धतीने होत असून पहिल्यांदाच ही प्रक्रिया येथे राबवली जात आहे. तालुक्यातील वीज, शेती, सिंचन, रस्ते या कामासाठी आपण प्रयत्न करत आहे, असेही आमदार शिंदे म्हणाले.

           या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातून आमदार संजयमामा शिंदे गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामराव गव्हाणे यांनी केले. याप्रसंगी सचिन गावडे ,विलासदादा पाटील,महेश बोराडे, रवींद्र वळेकर, सत्यवान लबडे, सुनील सावंत, राजेंद्रकुमार बारकुंड,चंद्रकांत सरडे ,सुहास गलांडे यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले. यावेळी तरडगाव चे सुदाम शेठ लेंडवे, तात्यासाहेब जाधव पाटील, अजिंक्य पाटील केडगावचे नेते मा.शंभूशेठ बोराडे,झरे गावचे युवा नेते मा.प्रशांत पाटील,मा.नागनाथ पाटील,मा.सुभाष अभंग,मा.डॉ.गोरख गुळवे,मा.संतोष गायकवाड,मा.महादेव पोळ,मा.सुजिततात्या बागल,मा.अमर भांगे,मा.पै.उमेश इंगळे,शेटफळ गावचे माजी सरपंच मा.विकास गुंड,मा शिवाजी पोळ,मा.गणेश कानगुडे,नेरले गावचे सरपंच मा.समाधान दोंड,निंभोरे गावचे सरपंच मा.रवि वळेकर, स्वप्निल पाडुळे मा.मारुती गुटाळ,मा.राजेंद्र धांडे,मा.रोहिदास सातव,मा.अशोक तकीक,मा.आशिष गायकवाड, वांगी नं.३ गावचे सरपंच मा.मयुर रोकडे,मा.सुहास नाना रोकडे,मा.सोमनाथ रोकडे,सोगांवचे सरपंच मा.विनोद सरडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.शंकर पोळ,मा.अजिंक्य पाटील,मा.सुहास गलांडे सर,वीट गावचे माजी सरपंच मा.उदय ढेरे,केमचे युवा नेते मा.गोरख पारखे सर, तसेच गावातील जेष्ठ नागरिक मा.शामराव गव्हाणे,मा.सचिन गावडे,मा.दादा सरडे,मा.जोतीराम पवार,मा.सचिन सरडे,मा.गव्हाणे साहेब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी