इंदिरा गांधी विद्या निकेतन, विद्यालयात मतदान जनजागृती अभियान संपन्न ! लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे – सत्यजित मच्छिंद्र

By : Polticalface Team ,24-10-2024

इंदिरा गांधी विद्या निकेतन, विद्यालयात मतदान जनजागृती अभियान संपन्न ! लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे – सत्यजित मच्छिंद्र

लिंपणगाव ( प्रतिनिधी) श्रीगोंदा पंचायत समिती शिक्षण विभाग, श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्या निकेतन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोशी वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या  मतदान जागृती अभियान अंतर्गत मतदार जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी मार्गदर्शन केले. “भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जिथे प्रत्येक प्रौढ नागरिक आपल्या मताचा वापर करण्यास स्वतंत्र असतो. सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदारांची महत्वाची भूमिका असते. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमुल्य आहे. एक-एकच्या मताने सरकार बनते आणि बिघडते. म्हणून, प्रत्येकाने निःपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे, आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग निश्चित केला पाहिजे, तसेच देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचीवर येऊ शकेल. आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. मतदार त्यांच्या मताचा उपयोग राष्ट्र उभारणी आणि विकासात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी करू शकतात. देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत आपले मत वापरावे कारण प्रत्येक मत देशाच्या भविष्यातील भागीदार बनते. भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार जनतेसमोर आपले विचार व अजेंडा मांडतात.  दुसरीकडे, ज्या उमेदवाराच्या अजेंड्यावर बहुतेक लोक आपली संमती व्यक्त करतात आणि सर्वाधिक मतदान करतात, त्याच उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जाते आणि ते देशातील सर्व विकासात्मक कामांसाठी जबाबदार असतात. म्हणून, प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मताधिकारांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनीही आपले मत व्यक्त केले. “सशक्त राष्ट्राची सुरुवात तुमच्या मताने होते. प्रत्येक नागरिकासाठी मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, निरोगी लोकशाही निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच, त्यांनी मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केले पाहिजेत आणि सरकारकडून वैध ओळखपत्र मिळविले पाहिजेत.  शेवटी, हे जाणून घ्या की ते फक्त आपला हक्कच नाही तर आपले कर्तव्य देखील आहे. निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविलं तर त्याला तुम्ही भुलू नका.”

सकाळ सत्रात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. प्रभात फेरीचे नियोजन पर्यवेक्षक अनिल जाधव, आरती परकाळे, पुष्पा काळे, वर्षा दरेकर, सुरेखा काळे, संदीप गायकवाड, कल्पक राऊत, शिवाजी क्षीरसागर, मंगेश काकडे, भाऊसाहेब राऊत, माऊली जाधव यांनी केले.

या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम भुजबळ, केंद्रप्रमुख अलका भालेकर, मुख्याध्यापक सुरेश हराळ, माजी मुख्याध्यापक लहू दरेकर, बन्यामीन पवार, बाळकृष्ण रोटकर, शैला जगताप, शमिना शेख व समस्त मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.