इंदिरा गांधी विद्या निकेतन, विद्यालयात मतदान जनजागृती अभियान संपन्न ! लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे – सत्यजित मच्छिंद्र

By : Polticalface Team ,24-10-2024

इंदिरा गांधी विद्या निकेतन, विद्यालयात मतदान जनजागृती अभियान संपन्न ! लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे – सत्यजित मच्छिंद्र

लिंपणगाव ( प्रतिनिधी) श्रीगोंदा पंचायत समिती शिक्षण विभाग, श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्या निकेतन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोशी वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या  मतदान जागृती अभियान अंतर्गत मतदार जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी मार्गदर्शन केले. “भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जिथे प्रत्येक प्रौढ नागरिक आपल्या मताचा वापर करण्यास स्वतंत्र असतो. सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदारांची महत्वाची भूमिका असते. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमुल्य आहे. एक-एकच्या मताने सरकार बनते आणि बिघडते. म्हणून, प्रत्येकाने निःपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे, आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग निश्चित केला पाहिजे, तसेच देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचीवर येऊ शकेल. आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. मतदार त्यांच्या मताचा उपयोग राष्ट्र उभारणी आणि विकासात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी करू शकतात. देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत आपले मत वापरावे कारण प्रत्येक मत देशाच्या भविष्यातील भागीदार बनते. भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार जनतेसमोर आपले विचार व अजेंडा मांडतात.  दुसरीकडे, ज्या उमेदवाराच्या अजेंड्यावर बहुतेक लोक आपली संमती व्यक्त करतात आणि सर्वाधिक मतदान करतात, त्याच उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जाते आणि ते देशातील सर्व विकासात्मक कामांसाठी जबाबदार असतात. म्हणून, प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मताधिकारांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनीही आपले मत व्यक्त केले. “सशक्त राष्ट्राची सुरुवात तुमच्या मताने होते. प्रत्येक नागरिकासाठी मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, निरोगी लोकशाही निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच, त्यांनी मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केले पाहिजेत आणि सरकारकडून वैध ओळखपत्र मिळविले पाहिजेत.  शेवटी, हे जाणून घ्या की ते फक्त आपला हक्कच नाही तर आपले कर्तव्य देखील आहे. निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविलं तर त्याला तुम्ही भुलू नका.”

सकाळ सत्रात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. प्रभात फेरीचे नियोजन पर्यवेक्षक अनिल जाधव, आरती परकाळे, पुष्पा काळे, वर्षा दरेकर, सुरेखा काळे, संदीप गायकवाड, कल्पक राऊत, शिवाजी क्षीरसागर, मंगेश काकडे, भाऊसाहेब राऊत, माऊली जाधव यांनी केले.

या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम भुजबळ, केंद्रप्रमुख अलका भालेकर, मुख्याध्यापक सुरेश हराळ, माजी मुख्याध्यापक लहू दरेकर, बन्यामीन पवार, बाळकृष्ण रोटकर, शैला जगताप, शमिना शेख व समस्त मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी