राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे

By : Polticalface Team ,2024-12-12

राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.

दौंड ता १२ डिसेंबर २०२४  राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. आघाडीला अपयश पचवता येईना म्हणून ते चुकांवर पांघरूण घालत आहेत. भाजपच्या यशामुळे आघाडीची नेते मंडळी सैरभैर झाली आहेत. कार्यकर्ते सत्तेच्या विरोधात फार काळ संघर्ष करू शकत नसल्याने ते भाजपशी जवळीक साधू लागले आहे. त्यांच्या मनात चिलबिचल चालू आहे. ईव्हीएमची विश्वासार्हता माहित असूनही केवळ कार्य़कर्ते टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील आघाडीची जानकार नेते मंडळी सुद्धा ईव्हीएमवर अपयशाचे खापर फोडत आहेत. हेच आश्चर्य वाटत आहे. अशी खरमरीत टिका दौंड तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केली आहे. 

ठोंबरे प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणतात की राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी १९९९, २००४, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या. त्यात त्यांना बहुमत मिळाले. तेव्हा मतदान यंत्र चांगले होते.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुतीचे एकमेव राहुल कुल वगळता सर्व आमदार हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे विजयी झाले होते. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला अनपेक्षित विजय मिळाला आहे. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. वायनाडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून निवडून आल्या तेव्हा ईव्हीएम चांगले होते. पंजाब व जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम चांगली. सुप्रियाताई सुळे खासदार झाल्या तेव्हा ईव्हीएम चांगले. अरे काय चालले आहे. मतदारांना तुम्ही मुर्ख समजता का.  शहाण्या मतदारांनी तुमचा करेक्ट कार्य़क्रम केलेला आहे.  


या सर्व वागण्यावरून महाविकास आघाडीची कीव करावी वाटते. ज्या नेत्यांनी एके काळी देशाचे, राज्याचे नेतृत्व केले अशा जाणकार नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घ्यावा ही खेदाची बाब आहे. ईव्हीएम कथित घोटाळ्यावरून  सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फटकारले असले तरी जीव जाईना म्हणून हातपाय खोडायची वेळ महाविकास आघाडीवर आली आहे. 


मुख्यमंत्री लाडकी बहीण, कृषी पंपाचे वीज बिल माफ, शेतकरी सन्मान योजना, शेती कर्ज माफी, घरकुल योजना, आरोग्य सुविधा अशा वैयक्तिक योजनांबरोबर दिर्घकालीन विकासाच्या योजनांमुळे महायुतीला राज्यात मोठे यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात गोळा उठला आहे. पक्षांचे व नेत्यांचे आस्तीत्व टिकवण्यासाठी मविआची ही कोल्हेकुई चालू आहे. मतदार राजा हा सुज्ञ असून महाविकास आघाडीने ही कोल्हेकुई चालूच ठेवली तर त्यांचे उरलेसुरले मतदार देखील कमी होतील. 


दौंडचा विचार केला तर आमदार राहुल कुल यांनी तालुक्याचे पुढील ५० वर्षांचे व्हिजन मतदारांपुढे मांडले आहे. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी येणार ( २२०० कोटी ), हडपसर ते बोरीभडकपर्यतचा सहापदरी उड्डाणपूल ( सहा हजार कोटी रूपये ), मुळशीचे धरणातील पाणी आणणार, प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय सुरू केले. क्रीडा संकुल, नवीन वीज उपकेंद्र ( १७५ कोटी ), रेल्वेवरील खामगाव,सहजपूर येथील उड्डाणपूल, बेबी कालवा अस्तरीकरण ( ३०० कोटी रू. ) अशी कितीतरी कामे सांगता येतील. या विकासकामांना मतदारांनी पसंती दिली आहे. फरक स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने रडगाणं बंद करावे.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.