दौंड तालुका परिवर्तन चळवळीचा कणा हरपला. कुसेगाव येथील गुरुजी संजय गायकवाड यांचे निधन.
By : Polticalface Team ,09-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०९ एप्रिल २०२५
दौंड तालुक्यातील शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आणि परिवर्तन चळवळीचे अग्रसेर असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे दौंड तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य गुरुजी संजय गुलाब गायकवाड (वय-५१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दि ७ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले असून परिवर्तन चळवळीचा कणा हरपला आहे.
दौंड तालुकाच नव्हे तर पुणे सोलापूर आहिल्या नगर सातारा जिल्ह्यातील छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि बौद्ध धम्माचा प्रसार प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन घरा घरात महापुरुषांचे विचार आणि बौद्ध धंम्माचे कार्य पोहचविण्याचे महान कार्य संजय गायकवाड यांनी केले आहे. पुरोगामी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा कार्यकर्त्यांना त्यांनी नेहमीच ऊर्जात्मक पाठबळ दिले. पाटस येथील परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी दौंड तालुक्यात विचारांची माणसे घडवली. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे ते दौंड तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे कार्य त्यांनी तळातील ग्रामीण भागात. ठिकठिकाणी जाऊन प्रेरणादायी प्रबोधन केले. श्रामणेर शिबीर, बौद्ध धार्मिक सहली तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले. तसेच या कार्याच्या अनुषंगाने कुसेगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील गाव तंटामुक्ती समितीचे उपअध्यक्ष या पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्याने बहुजन समाजातील अनेकांना प्रभावित केले.असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले गुरुजी संजय गायकवाड हे अचानक आपल्यातून गेले असल्याने. त्यांच्या बहुजन समाज कार्याची उणीव भासल्या शिवाय राहणार नाही. त्यांच्या अंत्यविधीला दौंड, श्रीगोंदा, हवेली इंदापूर बारामती तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अंतिम विधी या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आदरांजली अर्पण करून मनोगत व्यक्त केले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा सच्चा योद्धा भिम सैनिक काळाच्या पडद्याआड गेल्याने परिवर्तन चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना परिवर्तन वादी चळवळीच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली.
गुरुजी संजय गुलाब गायकवाड त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले एक मुलगी व वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दौंड तालुका व कुसेगाव परिसरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गुरुवार दि १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजे दरम्यान कुसेगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील राहत्या घरी पुण्यानुमोदन दिन आयोजित करण्यात आला आहे याची दखल घ्यावी.
त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात सन २०१५ साली तुळजापूर येथे राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
वाचक क्रमांक :