By : Polticalface Team ,14-05-2025
घोगरगाव | प्रतिनिधी – श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगावच्या सन २००७-०९ च्या ज्युनियर कॉलेज बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
हा आगळावेगळा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात पार पडला असून, त्यात माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत माजी प्राचार्य तथा रयत कौन्सिल सदस्य मा. तुकाराम कन्हेरकर सर, भगत सर, माजी प्राचार्य अविनाश गांगर्डे सर, रजनी गांगर्डे मॅडम, हिराबाई खंडागळे मॅडम, ज्ञानेश्वर गांगर्डे सर, मुख्याध्यापक नरवडे सर व जाधव सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कन्हेरकर सरांनी विद्यार्थ्यांनी जोपासलेल्या या स्नेहबंधनाचे कौतुक करत सांगितले की, "पैसा आणि आनंद या वेगवेगळ्या गोष्टी असून, सच्चा आनंद हा मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. अशा कार्यक्रमांमुळे गुरु-शिष्य नात्याचे बंध अधिक दृढ होतात."
कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कवी अक्षय पवार यांनीही उपस्थिती लावून शिक्षकांना स्वतःचा काव्यसंग्रह भेट दिला.
कार्यक्रमात सहभागी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी, प्रगतीचा प्रवास आणि गुरुजनांविषयीचा आदर व्यक्त केला. सर्वांनुमते शाळेच्या ग्रंथालयासाठी स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तके भेट देण्याचा संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी विद्या डोके, जयश्री उगले, शितल बेरड, कोहक वंदना, पूनम लुनिया, अश्विनी शेळके, जयश्री पठारे, वंदना तरटे, दिपाली लुनिया, जाहिरा शेख, उज्वला कोरडे, गौतम गारुडकर, अंबादास गारुडकर, किशोर गुंजाळ, अतुल बाबर, विकास वाळके, ज्ञानेश्वर विटकर, आणि अन्य माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब तरटे यांनी केले. सूत्रसंचालन अतुल बाबर व उज्वला उल्हारे यांनी तर आभार प्रदर्शन जाहिरा शेख यांनी केले. या स्नेहमेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी किशोर गुंजाळ, शितल गुंजाळ, अतुल बाबर व उज्वला उल्हारे यांनी विशेष परिश्रम घेतले.