By : Polticalface Team ,26-05-2025
दौंड तालुक्याचे आमदार ॲड राहूल कुल यांनी दौंड तालुक्यातील अवकाळी व अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हीसी द्वारे आढावा घेण्यात आला होता. या मध्ये तालुक्यातील १) नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे२) बंद रस्त्यांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त देणे३) कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जिवीत हानी होऊ नये या करिता सर्वांनी अलर्ट मोडवर राहण्या बाबत निर्देश दिले होते तसेच नागरिकाच्या मदतीसाठी बारामती येथील NDRF ची टीम मुक्कामी असल्याचे दौंड प्रशासनाने सांगितले होते. कुठं गेली मुक्कामी असलेली आपात कालीन फौज यांनी सुरक्षा का दिली नाही ? दौंड शहरात उपाय योजना का? केली नाही.दौंड शहरातील नागरिकांचा सवाल ? जेष्ठ नागरिक ताराबाई विश्वचंद्र आहीर यांच्या आपत्कालीन मृत्यूला नेमके जबाबदार कोण ? दौंड शहराला वाली नाही काय ? अपात कालीन अवस्था आसताना दौंड नगरपालिकेला मुख्याधिकारी का ? नाही दौंड नगरपालिका कर्मचारी वसाहत जीर्ण झालेली एक इमारत पाडण्यात आली मात्र ती पुन्हा बांधण्यात आली नाही.? दौंड शहरातील जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत परंतु त्या पाडल्या जात नाहीत ? दौंड नगरपालिका प्रशासन अजून किती जीव गेल्यावर नागरिकांच्या सुरक्षेते बाबत भुमिका घेतली जाईल ? याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
अवकाळी पावसाने शेतकरी नागरिकांच्या नाकी नऊ आले असून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील येणाऱ्या पावसाळ्यात काय परिस्थिती होईल या बाबत प्रशासनाने सावध भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.
वाचक क्रमांक :