सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
By : Polticalface Team ,27-05-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये सात सेवकांचा सेवानिवृत्तीचा समारंभ,अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका व अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ अनुराधावहिनी नागवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळेस त्या बोलत होत्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष श्री बाबासाहेब भोस होते,
आपले मनोगत व्यक्त करताना वहिनी म्हणाल्या, बापूंच्या विचारांचा वसा आणी वारसा सर्वच सेवकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला त्यामुळेच तालुक्यात सुजाण पिढी निर्माण झाली, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला सुसंस्कृत वळणवाट देण्याचा प्रयत्न हि ह्या सेवकांनी केला असे सांगितले, शिकवण्याचे प्रामाणिक काम तर यांनी केलेच, पण बापूंच्या विचाराला कधीही तिलांजली ह्या सेवकांनी दिली नाही महाविद्यालय आदर्श बनविण्यासाठी ह्या सेवकांनी काबाडकष्ट केले, ह्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालतात पोकळी निर्माण होईल परंतु संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रदादा नागवडे ती पोकळी भरून काढतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला व त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संस्था ऋण व्यक्त करीत आहे, असे ही त्या. मनोगतात म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले, त्यात ते म्हणाले की , ज्या सहकाऱ्यांसमवेत मी काम केले ते सुरवातीला एक सहकारी म्हणून व नंतर प्राचार्य म्हणूनही प्रत्येकवेळेस त्या सर्व सहकार्यांनी आपले काम प्रामाणिक केल्याचेही सांगितले व ह्या सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्त करून बापूंचा विश्वासही ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मिळवला होता असे सांगितले व त्यांच्या ज्ञानाचा फायदा महाविद्यालयाला इथून पुढच्या काळातही व्हावा व त्यासाठी आपण योगदान द्यावे हा आशावादही व्यक्त केला,
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्कार मूर्तींचेही मनोगत झाले त्यामध्ये प्रा सुनंदा मोरे मॅडम यांनी बापूंची आठवण काढत असताना माझ्यावर मुलीसारखे प्रेम त्यांनी केले व मी नागवडे कुटुंबाचीच एक सदस्य आहे याची जाणीव मला पदोपदी जाणवली त्यानिमित्त नागवडे कुटुंबाचे ऋण व्यक्त केले
तसेच सेवानिवृत्त उपप्राचार्य श्री भगवान सोनवणे यांनी, त्याकाळची खडतर परिस्थिती, बापूंची आठवण काढताना त्यांनी बोट धरून मला विद्यार्थी म्हणून महाविद्यालयामध्ये आणले व त्याच महाविद्यालयाचा उपप्राचार्य पदावर नियुक्त केले त्याबाबत बापूंची कृतज्ञता व्यक्त केली, बापूंचे आचार विचार त्यांची पुढची पिढी अंमलात आणतेय त्यामुळे नागवडे कुटुंबाचे भविष्य उज्वल असल्याचे सांगितले, व शेवटच्या श्वासापर्यंत नागवडे कुटुंबाचाच मी पाईक राहील अशी ग्वाही दिली
अध्यक्षीय मनोगतात श्री बाबासाहेब भोस यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास सांगितला व अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही हे महाविद्यालय तग धरून राहिले त्याचे कारण बापूंची समर्पित वृत्ती , राजेंद्रदादा नागवडे यांचे प्रशासन व ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे योगदान आहे हे सांगितले, व जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्या अनुभवाचा फायदा महाविद्यालयासाठी व्हावा हा आशावाद व्यक्त केला
कार्यक्रमासाठी नागवडे कारखान्याचे संचालक विश्वनाथदादा गिरमकर, लक्ष्मणअण्णा रायकर, मारुतीमामा पाचपुते, विठ्ठलनाना जंगले, प्रा सुरेश रसाळ उपस्थित होते तसेच माजी संचालिका सुरेखाताई लकडे, लगडताई उपस्थित होत्या, महाविद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आभार प्रा सुरेश रसाळ यांनी व्यक्त केले व निवेदन प्रा शंकर गवते यांनी केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी
संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन
घरगुती वादाचा राग मनात धरून. भाच्यानेच मामाच्या डोक्यात दगड घालुन केला खुन. यवत येथील धक्कादायक घटना.