आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
By : Polticalface Team ,27-05-2025
करमाळा प्रतिनिधी
आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन प्रत्यक्षात पिक पाहणी केली असुन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे मागणी केल्याचे सांगण्यात आले. करमाळा मतदार संघात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेले दोन आठवडे झाले पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे आज करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिवसभर नुकसानग्रस्त भागात गावभेट दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत तालूका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी सहायक बाबुराव बेरे, कृषी सहायक नितीन रांजून, कृषी सहायक सुप्रिया शेलार, कृषी सहायक राहुल गव्हाणे, कृषी सहायक सचीन सरडे, सभापती अतुल भाऊ पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे,आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, आदिनाथ संचालक हनुमंत सरडे, विजयराव कोकरे, अजित ननवरे, कैलास बोंदरे आदि उपस्थित होते. या दौऱ्यात शेटफळ येथील शेतकरी रंगनाथ पोळ, मुकूंद पोळ, विजय रामचंद्र लबडे, अनिल प्रल्हाद पोळ तर चिखलठाण येथील शिवाजी नारायण जगताप, कुगाव येथील बळीराम जनार्दन सरडे, प्रशांत लक्ष्मण कामटे आदि शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या केळी, डाळींब, उडीद, कांदा आदि पिकांची प्रत्यक्षात पाहणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधुन दिलासा दिला.यावेळी पावसामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाण्यासाठी रस्ते नसताना आमदार नारायण आबा पाटील यांनी वेळप्रसंगी ट्रॅक्टर मध्ये बसून तर काही ठिकाणी चिखल तुडवत चालत जाऊन बांधावर हजेरी लावली व शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नुकसानीचे अहवाल तयार करुन वरीष्ठ कार्यालयात ते सादर करावेत अशा सुचना दिल्या. तसेच करमाळा तालुक्यातील गावांसह या मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातही अनेक शेतकऱ्यांची उभी पिके अवकाळी मुळे हातातून गेली असून काही ठिकाणी काढणी केलेला कांदा रानात ढिग करुन ठेवले असल्याने तेही हाती लागले नसल्याचे सांगत जिथे मी जाऊ शकत नाही अशा मतदार संघातील सर्वच नुकसानग्रस्त भागात कृषी व महसुल विभागाचे अधिकारी जाऊन अहवाल तयार करतील, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रसांगवधान दाखवून तातडीने केलेल्या या भेट व पाहणी दौऱ्यामूळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी
संत शेख महंमद व संत तुकाराम यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन
घरगुती वादाचा राग मनात धरून. भाच्यानेच मामाच्या डोक्यात दगड घालुन केला खुन. यवत येथील धक्कादायक घटना.