राज ठाकरेंना महाराष्ट्रात नवनिर्माण नव्हे तर हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करायचा आहे :उत्तरेश्वर कांबळे
By : Polticalface Team ,Tue Apr 19 2022 15:42:30 GMT+0530 (India Standard Time)
जेऊर प्रतिनिधी: महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असुन हिंदुच्या,सणवार,रात्री अपरात्री मंदीरांवर भोंगे लावून सुरू असलेले किर्तने, भजने जागरण गोंधळांवर मुस्लिमांनी कधी आक्षेप घेतला नाही.
परंतू मशिदीवरच्या भोंग्यांना मनसेच्या राज ठाकरे यांनी विरोध केला असुन राज ठाकरेंना महाराष्ट्रात नवनिर्माण करायचे नव्हे तर हिंदू -मुस्लीम वाद निर्माण करायचा आहे अशी.जळजळीत टिका भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे ते प्रतिनिधींशी बोलत होते .
कांबळे पुढे बोलताना म्हणाले की
राज ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रात काहीच भवितव्य दिसत नसलेल्या ते प्रसिद्धीकरिता (अजान)मशिदीच्या भोंग्या बद्दल बोलत आहेत.
त्यांचा बोलविता धनी हा नागपुरच्या रेशिमबागेतील आहे .
हिंमत असेल तर ठाकरेंनी स्वतः किंवा मुलगा अमित ठाकरे यांना एखाद्या मशिदीवरचा भोंगा काढून दाखवावा उगीचच तरूणांची माथी भडकावून पोळी भाजून घेऊ नये.
ठाकरे आधी उत्तर भारतीय लोकांना विरोध करायचे, छटपुजेला विरोध करायचे त्याच आणी टोल नाक्याच्या संदर्भातील आंदोलनाचे काय झाले यावर ठाकरेंनी बोलायला पाहिजे व शेतक-यांच्या, शेतमजूर सर्व सामान्य नागरीकांच्या मुलभूत प्रश्नांवर महागाई वर बोलायला पाहिजे असे. उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.
वाचक क्रमांक :