By : Polticalface Team ,26-10-2025
आपल्या तालुक्यातील राजकारण आज एका विचित्र वळणावर येऊन ठेपलं आहे. एकीकडे गावोगावी तरुण कार्यकर्ते, शिक्षक, शेतकरी, व्यापारी समाजकार्यासाठी पुढे येत आहेत, पण दुसरीकडे सत्तेची सूत्रे काही मोजक्या घरांमध्येच फिरताना दिसतात.
अलीकडेच आपल्या परिसरात झालेल्या चर्चेत पुन्हा एक उदाहरण समोर आलं — आमदारांचा मुलगा पुन्हा आमदार, दुसरा मुलगा जिल्हा परिषदेची तयारी, पुतण्या सरपंच, तर सुनबाई नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत आहेत.
लोकशाहीत प्रत्येकालाच उमेदवारीचा अधिकार आहे, पण लोकांच्या मनात प्रश्न उमटतो — राजकारण जनतेसाठी की घराणेशाही साठी?
सामान्य कार्यकर्ता वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतो. पावसात, उन्हात झेंडे उचलतो, लोकांपर्यंत योजना पोहोचवतो, पण निवडणुकीच्या वेळी मात्र त्याचं नाव उमेदवारीच्या यादीत दिसत नाही.
कारण तिकीट आधीच ‘घरात’ ठरलेलं असतं.
ही भावना कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष आणि निराशा निर्माण करते.
या घराणेशाहीचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे — नवं नेतृत्व थांबतं.
आपल्या गावात, तालुक्यात किती हुशार तरुण आहेत, ज्यांना जनतेसाठी काम करण्याची उमेद आहे. पण त्यांना राजकारणात प्रवेश मिळतो पण ऐन वेळी तिकीट डावळलून घराणेशाही ला प्राधान्य दिले जाते. कारण राजकारण म्हणजे आता वंशपरंपरा झालं आहे, विचारसंपत्ती नव्हे.
निश्चितच, काही राजकीय कुटुंबांनी चांगलं काम केलं आहे. विकासकामे केली, विश्वास जिंकला — हे सत्य नाकारता येत नाही. पण सत्तेचा वापर जनतेसाठी झाला पाहिजे, घरासाठी नव्हे, हेही तितकंच खरं आहे.
आता जनता जागी होत आहे. लोक विचारायला लागले आहेत —
“माझ्या गावात रोजच्या समस्या सुटत नाहीत, पण पदं मात्र त्याच घरात का जातात? विकासासाठी इतरांना संधी देऊन पाहण्यासाठी काय हरकत आहे.”
आज गरज आहे ती जनतेतील नेतृत्वाची.
राजकारणात नवीन चेहरे आले पाहिजेत, तरच लोकशाही जिवंत राहील.जनतेनं ठरवायचं आहे — आपण मत देतोय कामाला की घराणेशाहीला?
जर लोकांनी विचारपूर्वक निर्णय घेतला, तर खऱ्या अर्थानं आपला तालुका, आपला जिल्हा आणि आपला महाराष्ट्र घराणेशाही मुक्त होईल आणि लोकशाही टिकेल.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष