उन्हाच्या तीव्रतेबरोबरच थंड पेयाची मागणी वाढली श्रीगोंदा तालुक्यात 40 अंशच्यापुढे तापमान जनजीवन विस्कळीत शेती उद्योगाची तीन तेरा

By : Polticalface Team ,Wed Apr 20 2022 14:26:56 GMT+0530 (India Standard Time)

उन्हाच्या तीव्रतेबरोबरच थंड पेयाची मागणी वाढली श्रीगोंदा तालुक्यात 40 अंशच्यापुढे  तापमान जनजीवन विस्कळीत शेती उद्योगाची तीन तेरा श्रीगोंदा( प्रतिनिधी अस्लम शेख)उन्हाची तीव्रता आता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने थंड पेयाची मागणी वाढताना दिसते. श्रीगोंदा तालुक्यात जवळपास 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद होताना दिसते. अंगाची लाहीलाही करणारा हा चालू वर्षीचा उन्हाळी हंगाम अत्यंत थरारक रूप धारण करताना दिसत आहे. या अतिउष्णतेमुळे विहिरी कूपनलिका तसेच गावच्या पुरवठ्याच्या पाणी पातळीत देखील मोठी घट होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक खेडोपाडी महिला व ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. यामध्ये आहे त्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होताना दिसत आहे. त्यामुळे चालू वर्षीचा उन्हाळी हंगाम सर्वांनाच बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. अशा या उन्हाळी हंगामात तालुक्यातील अनेक ग्रामदेवतेचा यात्राउत्सव साजरा होत असतानाच यात्रा कालावधीत देखील अनेक गावांमध्ये अतिउष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणताना दिसत आहे. उन्हाळी हंगाम म्हटलं की, गावोगावी शहर व खेडोपाडी रसवंती गृह थाटली जात आहेत. शेतातून अगर प्रवासातून आल्यानंतर उष्ण शरीर थंड तसेच कष्टाच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी उसाचा रस त्याबरोबरच इतर थंड पेयाचा आस्वाद घेण्यासाठी रसवंती ग्रहावर गर्दी होताना दिसत आहे. एकीकडे उन्हाळी हंगाम वेगात सुरू असताना शेती उद्योगाची कामे मात्र ठप्प होताना दिसत आहेत. चालू उन्हाळी हंगामामध्ये लिंबू फळांचा भाव गगनाला भिडला तर कांद्याचा भाव मात्र कवडीमोल दिसून येतो. चांगल्या प्रतीचा कांदा 10 ते 12 रुपये किलोने बाजार समित्यांमध्ये व्यवहार होताना दिसतो आहे. त्यामुळे चालू वर्षीचा कांद्याने शेतकऱ्यांचा मोठा वांदा केल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कांदा वाखारीमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी लगबग सुरू केल्याचे दिसते. ज्यावेळेस कांद्याला दुपटीपेक्षा जास्त भाव मिळेल त्या वेळेसच वखारीतून कांदा मार्केटमध्ये आणण्याचे काही शेतकऱ्यांनी स्वप्न ठेवले आहे. सद्यस्थितीला कांदा उत्पादक शेतकरी दहा ते बारा रुपये किलोने कांदा विक्रीसाठी देण्यास नकार देताना दिसत आहे .कारण काढणे कापणे मजुरी व बारदानचे वाढलेले भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने कांदा उत्पादकांनी अखेर वखारी तयार करून पुढे वाढीव भावाची अपेक्षा ठेवली आहे. श्रीगोंदा तालुक्यात यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन तयार झाले आहे. परंतु भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कमी पाण्यावर शेतकरी अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजारपेठेत मात्र शेतीमालाला कवडीमोल किंमत मिळते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. श्रीगोंदा तालुका हा 70 टक्के सिंचन क्षेत्रात मोडला जातो. असे जरी सांगितले असले तरी कुकडी लाभ क्षेत्रात मात्र आवर्तन वेळेत मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेली उभी पिके मात्र पाण्याअभावी भुईसपाट होतात. त्यामध्ये उन्हाळी हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत .कुकडीचे पाणी आले अन गेले अशी अवस्था या कुकडी लाभक्षेत्रात दरवर्षी होत असल्याने शेतकऱ्यांचा मात्र अपेक्षा भंग होत आहे. मागील आठवड्यात कुकडीचे पाणी 132 मधून सोडण्यात आले. त्याचा वेगही अत्यंत कमी दाबाने ठेवण्यात आला आणि कालावधी देखील कमी केला. त्यामुळे या उन्हाळी कुकडी आवर्तनचा लाभ टेल खालील शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. वास्तविक पाहता या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांनी शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याची गरज होती. परंतु पाण्याचा गेज कमी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या सर्वच बाबी कारणीभूत ठरल्याने शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. त्यामुळे चालू वर्षाचा तीव्र उन्हाळी हंगाम आणि पाणीटंचाईचा आगडोंब यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी