५ वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू; अरुंद रस्त्यामुळे गमवावा लागला जीव

By : Polticalface Team ,Fri Apr 22 2022 22:20:04 GMT+0530 (India Standard Time)

५ वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू; अरुंद रस्त्यामुळे गमवावा लागला जीव बीड जिल्हा प्रतिनिधी:- बाळराजे जाधव केजकडून माजलगावकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर टायरखाली येऊन शिवराज लक्ष्मण सुरवसे या पाच वर्षीय बालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धारूर बस डेपोच्या समोर शुक्रवारी (दि.22) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना केवळ अरुंद रस्त्यामुळे झाली आहे. मागील चार वर्षात खामगाव पंढरपूर या महामार्गाच्या धारूर घाटातील अरुंद रस्त्यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. तरी अद्यापही रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशी घटना घडली येथील बस डेपोच्या समोरासमोर केजकडून माजलगावकडे जाणाऱ्या दोन ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरखाली (एम एच 44 डी 1908) शिवराज सुरवसे हा पाच वर्षीय बालक आल्याने ही दुर्घटना घडली. सदरील घटना घडल्यानंतर पाच वर्षीय बालक ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरखाली अडकून पडल्याने जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर उचलून मृत बालकाचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पुढील कारवाई केली. ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. झालेली घटना खामगाव पंढरपूर या महामार्गावर धारूर घाटाच्या जवळील अरुंद रस्त्यावर झाली आहे. चार वर्षांपूर्वी तयार झालेल्या या महामार्गवर 11 किमी अरुंद रस्ता ठेवण्यात आल्याने सतत अपघाताची मालिका घडत असते. वेळोवेळी निवेदन देऊन रस्ता रुंदीकरणाची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे. पाच वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यूला रस्त्याचे अरुंदीकरण कारणीभूत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रक्रिया येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी