आष्टीत जलसिंचन विहिरी व शेत तलावांच्या कामांत अनियमितता मनसेचे कैलास दरेकर यांचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी
By : Polticalface Team ,Sun May 01 2022 16:26:46 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी, दि. 1 (प्रतिनिधी) - महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आष्टी तालुक्यात सुरू असलेल्या जलसिंचन विहिरी व शेततलावांची कामे आर्थिक तडजोडीतून सुरू असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आष्टी तालुक्यात सध्या जलसिंचन विहीरी व शेततलावांची कामे पंचायत समितीमार्फत हाती घेण्यात आलेली आहेत. या कामांना आर्थिक तडजोडींतून मान्यता देण्यात आल्याचे समोर येत आहे. गटविकास अधिकारी यांनी जलसिंचन विहिरी व शेततलावांच्या कामांची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. मात्र, प्रस्ताव मागणीसाठी कोणतीच प्रसिद्धी गेली नाही. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती नेमकी कशी झाली साध्य झाली या उद्दिष्टपूर्तीची चौकशी करावी, मागणी यापूर्वीच केली असून त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
वरील आर्थिक गैरव्यवहारांची व कामांतील अनियमिततेची चौकशी तत्काळ करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती रोजगार हमी मंत्री, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
(चौकट1)
आर्थिक तडजोडीची आडिओ क्लिप व्हायरल
या कामांबाबतच्या आर्थिक तडजोडी सुरू असून गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे व तांत्रिक अधिकारी कोळेकर यांनी लाभार्थी महेश सोले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे साधलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या क्लिपवरून या योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप चौकशीकामी सादर करण्यात येतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
(चौकट2)
मजुरांकडे काम मागणीसाठी 500 रुपयांची मागणी
जलसिंचन विहिरी व शेततलावांच्या सुरू असलेल्या कामांची मागणी पंचायत समितीत सादर करण्यासाठी गेलेल्या मजुरांकडे प्रतिमागणी 500 रुपयांची मागणी लाभार्थींकडे करण्यात येत आहे, अशा लाभार्थींच्या तक्रारी आहेत. अधिकारी व कर्मचार्यांीच्या या खाबुगिरीमुळे गरजू लाभार्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पैसे दिल्याशिवाय मग्रारोहयोची कामे होत नसल्याचे दिसून येते. जलसिंचन विहिरींना भुजल प्रमाणपत्रांशिवाय मंजुरी दिली गेली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.