ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ सुरू करून सर्वसामान्यांची हेळसांड थांबवावी- गणीभाई तांबोळी

By : Polticalface Team ,Mon May 02 2022 14:41:26 GMT+0530 (India Standard Time)

ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ सुरू करून सर्वसामान्यांची हेळसांड थांबवावी- गणीभाई तांबोळी आष्टी ता.१ (बातमीदार)- एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून कर्मचारी आप आपल्या आगारात दाखल होत कर्तव्यावर हजर झाले आहेत. तरी ही ग्रामीण भागासह काही शहरात जाण्यासाठी नागरिकांना आष्टी आगारातून बस सेवा नसल्याने सर्वसामान्य नागरिकासह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आजही खासगी वाहनातुन मागेल तेवढे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करून सर्वसामान्य नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे आष्टी शहराध्यक्ष तथा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गणीभाई तांबोळी यांनी विभागीय नियंत्रक बीड यांना निवेदनाद्वारे केली आहे. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फटका बसला. बस बंद असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही खासगी वाहनांनी सर्वसामान्य नागरिकांना चांगलेच लुटले. आता एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून कर्मचारी ही कर्तव्यावर हजर झाले आहेत. अनेक बसेस ही सुरू आहेत. परंतु आष्टी आगारातून आजही ग्रामीण भागातील बस सेवा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आष्टी कडा धामणगाव धानोरा येथे विविध कामासाठी ये जा करण्यासाठी खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करत आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे आष्टी आगारातून मेहकरी पिंपळा सावरगाव मुगगाव बीडसांगवी धामणगाव देवळाली मिरजगाव या ग्रामीण भागासह आष्टी येथून स्वारगेट बारामती औरंगाबाद पंढरपूर आदी बस सेवा तात्काळ सुरू करून सर्वसामान्य प्रवाशांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी गणीभाई तांबोळी यांनी विभागीय नियंत्रक बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी