एकीकडे मुलीचं लग्नं लागतं व्हतं आणि वस्तिवर कडब्याच्यागंजीसह गोठा जळत होता दुर्दैवी घटना
By : Polticalface Team ,Sat May 14 2022 15:23:31 GMT+0530 (India Standard Time)
बीड तालुक्यातील मौजे खंडाळा येथील ढेलेवस्ती वरील अशोक सुर्यभान बांगर यांच्या मुलीचं काल दि.१३ मे शुक्रवार रोजी दुपारी नेकनुर येथील कालिका मंगल कार्यालयात लग्न होते त्यामुळेच तुरळक वयस्क मंडळी वगळता सर्वजण लग्नात व्यस्त होती. त्यातच ऐनदुपारी दिडच्या सुमारास अशोक व लक्ष्मण दोघांभावांच्या गोठ्यासह ज्वारिच्या गंजीला आग लागल्याची बातमी फोनवरून मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण केले परंतु ऊशीर झाला होता आगीत १० क्विंटल लसुण अंदाजे किंमत १ लाख रूपये, ज्वारीचा १० हजार कडबा, ऊसाचं ५० हजार रूपये किंमतीचं व-हाडं ,दिड लाख रूपये किंमतीचा गोठा, त्यातील शेतीची औजारे आदि एकुण तिन-साडेतीन लाख रूपयांच नुकसान झालं.
महसुल प्रशासन फिरकलंच नाही
___
गोठ्याला व गंजीला आग लागल्यानंतर सरपंच यांनी अग्निशमन दलाला फोनवरून कळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या त्याचवेळी महसुल प्रशासनातील तलाठी, मंडळ आधिकारी यांना कळवण्यात आले होते परंतु घटना उलटुन २४ तास होत आहेत तरी महसुल प्रशासनाचं कोणीही फिरकलं नाही असं अशोक बांगर यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :