शेतकरी आत्महत्याप्रकरणात कुटुंबियास शासकीय मदत मिळण्यास विलंब जिल्हाप्रशासनाच्या ऊदासीन धोरणाच्या निषेधार्थ लक्ष्यवेधी गळफास आंदोलनास प्रतिबंध केल्याने ठीय्या आंदोलन
By : Polticalface Team ,Tue May 31 2022 10:48:54 GMT+0530 (India Standard Time)
बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे २०२१-२०२२ वर्षात ४८ प्रकरणे प्रलंबित असून शेतक-यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्यास शासनाच्या ऊदासीन धोरणामुळे येणा-या अडचणीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२३ मे २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " लक्ष्यवेधी प्रतिकात्मक गळफास "आंदोलन करण्यात येणार होते त्यासाठी गळफास आदिंची तयारी केली होती परंतु पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्यामुळे ठीय्या आंदोलन करण्यात आले. निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री,प्रधान सचिव कृषिमंत्री,विभागीय आयुक्त यांना देण्यात आले.आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसुफ, भाजपा तालुकाध्यक्ष बीड किसानमोर्चा बाळासाहेब मोरे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन ,सय्यद आबेद,शेख मुबीन बीडकर,सुदाम तांदळे,बलभीम उबाळे,सुभाष बांगर,विजय कवडे,
सविस्तर माहीतीस्तव:-
सन २०२१-२०२२ या वर्षांत तब्बल ४८ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे चौकशीमुळे प्रलंबित असून २० प्रकरणात मयत शेतक-यांचे व्हिसेरा रिपोर्ट औरंगाबाद प्रयोगशाळेतुन अद्याप प्राप्त झालेले नाहीत त्यामुळेच शेतकरी कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्यास अडचण येत आहे.
शेतकरी आत्महत्येनंतर त्याचा पोलीस पंचनामा करून मयत शेतक-याचा व्हिसेरा राखुन ठेवला जातो. तालुकास्तरीय समिती द्वारा पोलीस पंचनामा व लॅबकडील व्हिसेरा रिपोर्टचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला जातो.त्यानंतर मयत शेतकरी कुटुंबियास ७० हजार रूपयांची एफडी व ३० हजार रूपयांचा धनादेश असे १ लाख रूपये दिले जातात.मात्र पोलीस पंचनामा व प्रलंबित लॅब रिपोर्ट मुळे अनेकांना १ लाख रूपये मदत मिळण्यासाठी १-२ वर्षे थांबावे लागत असल्याचे प्रलंबित आकडेवारी वरून दिसुन येते.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चालु २०२२ वर्षात जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्याच्या कालावधीत ८६ शेतक-यांनी आत्महत्येची प्रकरणे दाखल झाली होती त्यातील ४२ प्रकरणे पात्र असुन अपात्र प्रकरणे १० आहेत,एकुण ८६ प्रकरणांपैकी ३४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत तर २०२१ मधिल १४ प्रकरणे प्रलंबित आहेत त्यामुळेच मयत शेतकरी कुटुंबियांना वेळेवर मदत मिळण्यास अडचण येत असून संबधित प्रकरणात तात्काळ उपाययोजना करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत अशी मागणी केली असून निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद ,शेख मुबीन आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.
कृषी योजनांचा लाभ राजकीय कार्यकर्ते व आधिका-यांच्या दलालांना
:-बाळासाहेब मोरे (भाजपा बीड तालुकाध्यक्ष किसान मोर्चा )
कृषी विभागातील ९० शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना न होता राजकीय पुढा-यांचे धनदांडगे कार्यकर्ते व आधिका-यांचे पोसलेले दलाल व त्यांचे निकटवर्तीय यांनाच होत असून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात येत असून पोक्रा योजनेंतर्गत योजनांमध्ये अपहार कृषी विभागातील आधिका-यांच्या संगनमतानेच होत असून केवळ कागदोपत्रीच योजना राबविण्यात येत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास भविष्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी