आदिवासी पारधी समाज संघटनेचा नगरपरिषद कार्यालयावर धडकला बोंबाबोंब मोर्चा; बेघर कुटुंबाला तातडीने घरे द्या

By : Polticalface Team ,Thu Jun 02 2022 22:23:04 GMT+0530 (India Standard Time)

आदिवासी पारधी समाज संघटनेचा नगरपरिषद कार्यालयावर धडकला बोंबाबोंब मोर्चा; बेघर कुटुंबाला तातडीने घरे द्या श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीत बायपासजवळ सुमारे तीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा कुटुंबांचे रहिवासी अतिक्रमित कच्ची घरे पडणाऱ्या मुख्याधिकारी मंगेश देवरे व प्रशासनाचा तीव्र निषेध करत आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. बळे सर, बसपाचे सुनील ओहोळ, आरपीआयचे राजा जगताप, लोकशिक्षणचे प्रमोद काळे यांच्यासह अतिक्रमणधारक स्त्री-पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नंदकुमार दुधाळ यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा नेमण्यात आला होता.

याबाबत वृत्त असे की, श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या नियंत्रणाखाली तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने दि. २५ ते २८ मे या कालावधीत शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये बायपासजवळ सुमारे तीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा १६ कुटुंबांचे रहिवासी अतिक्रमित कच्ची घरे पाडण्यात आली. या कुटुंबातील काही कुटुंबप्रमुख नगरपरिषदमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. ज्यांची घरे उध्वस्त झालीत त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून घरकुल मंजूर करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच राहत्या घराखालची जागेची नोंद करून तातडीने घरकुल मिळावे या मागणीसाठी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली बेघर झालेल्या आदिवासी पारधी समाजाच्या वतीने बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे म्हणाले की, उन, वारा, पाऊस याचा कोणताही विचार न करता प्रशासनाने आदिवासी पारधी समाजाची घरे जाणीवपूर्वक काढलीत असे आमचे मत असून ज्या काळामध्ये मानसमाणसाच्या जवळही जात नव्हती त्या कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींना अग्निदाह देण्याची कामे याच आदिवासी पारधी समाजाच्या सफाई कामगारांनी केली असताना पुनर्वसन न करता त्यांची घरे पाडल्यामुळे पालिकेची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने आमच्या मागण्या मान्य करून बेघरांना घरे द्यावीत अशी मागणी केली.

तसेच जिल्हाध्यक्ष अजित भोसले म्हणाले की, आज आम्ही तहसिल कार्यालय ते श्रीगोंदा नगरपरिषद असा शांततेत काढलेला मोर्चा हा पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आहे. मात्र जर आम्हाला येथे न्याय मिळाला नाही तर आम्ही भविष्यात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आंदोलन छेडणार आहोत. प्रा. बळे सर म्हणाले की, आदिवासी पारधी समाजामध्ये अनेक चालीरीती, रूढी पाळल्या जातात. त्यामुळे त्यांना घरे देत असताना त्यांच्या संस्कृतीचाही विचार पालिका प्रशासनाला करावा लागणार आहे.

दरम्यान नगरपरिषदेचे गटनेते मनोहर पोटे, मुख्याधिकारी मंगेश देवरे आणि नगरसेवक आणि आदिवासी पारधी समाज संघटनेचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत बेघर कुटुंबाना त्यांच्या सोयीनुसार घरे बांधून देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी सुकली चव्हाण, राहुल भोसले. आपल्या काळे, पहिल्या काळे, अमृत काळे, गुलाब काळे, धीरज भोसले, स्वप्नील पवार रामसिंग भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीमध्ये दोन ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा विचार करून बायपास येथील १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा १६ बेघर कुटुंबाना घरकुल मंजूर करून घरे बांधून देण्यात येतील. तोपर्यंत त्यांना तात्पुरता निवारा करून देण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी यावेळी दिली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी