जिल्हाप्रशासनाचे कागदोपत्री गाजर विकासाचे धोरण जिल्हापरिषद शिक्षक-विद्यार्थ्यांचे मरण ;गाजर दाखवा आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Mon Jun 06 2022 20:38:45 GMT+0530 (India Standard Time)

जिल्हाप्रशासनाचे कागदोपत्री गाजर विकासाचे धोरण जिल्हापरिषद  शिक्षक-विद्यार्थ्यांचे मरण ;गाजर दाखवा आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड जिल्हापरीषदेमार्फत कागदोपत्रीच मोठमोठ्या योजना राबविण्यात येत असून शाळांमध्ये मोठ्याप्रमाणात जीवनमान उंचावल्याचे दाखवून गाजर विकासाचे धोरण राबविण्यात येत असून प्रत्यक्षात मात्र हलगर्जीपणामुळे शिक्षक-विद्यार्थ्यांचे मरण आले असून बीड जिल्ह्य़ातील जिल्हापरिषद २६४ शाळांमधील ४६० वर्गखोल्या जीर्णावस्थेत,पडझड झालेल्या धोकादायक असून शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करत असून पावसाळ्यापुर्वी तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०६ जुन सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर दाखवा आंदोलन करण्यात येऊन जिल्हाप्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसुफभाई,माजी सैनिक अशोक येडे,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडीया पॅथर नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन बीडकर,सुदाम तांदळे,मतकर आण्णासाहेब,सुहास जायभाये,बलभीम उबाळे,आदि सहभागी असुन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना यांना निवेदन देण्यात आले. मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका झाल्यास जबाबदार कोण?? ___ जीर्णावस्थेत असलेल्या शाळांमधील वर्गखोल्यांची पडझड झाली असून पावसाळ्यात सर्वांचाच जीव धोक्यात असतो,छत कधी कोसळेल याचा नेम नाही,शाळेने वारंवार शिक्षणाधिकारी जिल्हापरिषद बीड यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही अथवा निधी नसल्याचे कारण सांगून प्रश्न निकाली काढण्यात येतो एकंदरीतच प्रशासनाला याचे गांभीर्य दिसुन येत नाही पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण??जिल्हाप्रशासनातील आधिकारी याची जबाबदारी घेणार काय???असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. स्वच्छ भारत मिशनचा डांगोरा कागदावरच ____ बीड जिल्ह्य़ात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधल्याचा गवगवा मोठ्याप्रमाणात करण्यात येतो मात्र धक्कादायक बाब म्हणजे जिल्हापरीषदेच्या ४३७ शाळांमध्ये मुलांसाठी तर २७५ शाळांमध्ये स्वच्छतागृहेच आस्तित्वातच नाहीत तसेच १६७ मुलांचे आणि ११५ मुलींचे स्वच्छतागृह वापरात नाहीत. त्यामुळेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यात आलेला दावा फोल ठरत आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत १२ अनुदान परत गेल्याप्रकरणात जबाबदार आधिका-यांवर कारवाई करा ___ समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा प्रकल्प कार्यालयाच्या खात्यात जमा झालेले १२ कोटी रूपये अनुदान वितरणासाठी पीएफएमएस प्रणालीचा योग्य वापर करण्यात आला नसल्यामुळेच परत गेले यातुन शाळा अनुदान,शिक्षक अनुदान तसेच किरकोळ शाळादुरूस्ती आदिसाठी निधी वापरण्यात येत असताना आता निधी अभावी मोठ्याप्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण होत असून संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी