By : Polticalface Team ,Thu Jun 09 2022 11:39:07 GMT+0530 (India Standard Time)
उपलब्ध माहितीनुसार , दोघेही जत तालुक्यातील एकुंडी येथील रहिवाशी होते आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. १ जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील एका तरुणाशी झाला आणि ती सासरी निघून गेली मात्र पुन्हा माहेरी आल्यावर तिने प्रियकरासोबत हे टोकाचे पाऊल उचलले. आपापल्या घरामध्ये सकाळच्या सुमारास दोघांनीही विषप्राशन करुन आत्महत्या केली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
अश्विनी लग्नानंतर रविवारी एकुंडी येथे आली होती त्यानंतर सोमवारी सकाळी दोघांनीही आपापल्या घरी विषारी औषध प्राशन केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एकमेकांना फोन करून हा निर्णय घेतला असल्याची शक्यता असून दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दोघांच्याही घरच्या लोकांना लक्षात येताच त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून तपास पोलीस करीत आहेत वाचक क्रमांक :