विध्यार्थ्यांनी ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यश निश्चित -- प्रा.भोपळे(प्रणव रामचंद्र भोसले तालुक्यात प्रथम)
By : Polticalface Team ,Sun Jun 19 2022 13:22:22 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
विध्यार्थ्यांनी ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यश निश्चित चालून येते असे महाराष्ट्र राज्य ओबीसी शिक्षक नेते प्रा. पांडुरंग भोपळे यांनी केले आहे.श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बारावी विज्ञान प्रणव रामचंद्र भोसले याने बोर्ड परीक्षेत ९१.३३ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान घेतला त्याबद्दल प्रणव याच्या निवासी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्रा.भोपळे बोलत होते.प्रा.भोपळे यांनी सांगितले की आज ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुणवत्तेच्या बाबतीत प्रगती होत चालली असून हि कौतुकास्पद बाब आहे.प्रणव सारखा विध्यार्थी सुध्दा गुणवत्ते बाबत मागे नाही हे दाखवून दिले आहे प्रा.भोपळे यांनी असे यावेळी सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे पदाधिकारी प्रा.दादासाहेब गिरमकर ,प्रा.नितिन झणझणे आदी शिक्षक उपस्थित होते .प्रणवचे आई वडील देखील या सत्काराने भारावून गेले.
वाचक क्रमांक :