पाऊस पुन्हा सर्व दूर खरीप हंगामाच्या पेरणीला वेग श्रीगोंदा तालुक्यातील पाणीटंचाईची व्यथा

By : Polticalface Team ,Sat Jul 02 2022 16:07:24 GMT+0530 (India Standard Time)

पाऊस पुन्हा सर्व दूर खरीप हंगामाच्या पेरणीला वेग श्रीगोंदा तालुक्यातील पाणीटंचाईची व्यथा लिंपणगाव (प्रतिनिधी )श्रीगोंदा तालुक्यात पाऊस तूर्ता थांबला गेला आहे. पाऊस थांबल्यामुळे खरीप हंगामाचे पेरणीला मोठा वेग आला आहे. जमिनीत वापसा तयार झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके अनुक्रमे कपाशी, बाजरी ,मूग, उडीद इत्यादींची लागवडी व पेरणीला मोठा वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. यंदा रोहिणी व मृग नक्षत्राने पाठ फिरवली, मात्र आदरा नक्षत्राने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. आता गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीमध्ये मग्न झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन खरीप हंगामाच्या उत्कृष्ट बियाण्यांची खरेदी करण्यासाठी दिसत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी पावसात जोर नसला तरी शेतकरी मात्र खरीप हंगामाचे पेरणीसाठी तयार नाहीत त्यामुळे कमी अधिक ओलीवर खरीप हंगामाच्या पेरण्या जोमात सुरू आहेत. श्रीगोंदा तालुक्यात जवळपास 45 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद सांगितले जाते. परंतु पाणी पातळीत मात्र वाढ झाली नसल्याचे देखील शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीला दिवसभर कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाची तीव्रता तर उकड्याचे हे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा या दिवसभर बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिकाची मोठी चिंता लागून आहे. आता गेल्या दोन दिवसापासून वाऱ्याचा प्रवाह वेगाने वाढताना दिसतो. त्यामुळे हे वारे पावसाचा अंदाज सांगतात की? पाऊस नाही म्हणून सांगतात. याबाबतही शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला विहिरी व कुपनलिकाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. दिवसभर बदलणाऱ्या वातावरणामुळे आहे, त्या पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होताना दिसते. त्यामुळे खरीप हंगामाच्या पिकांचे भवितव्य अंधकारमय आहे. अनेक शेतकऱ्यांनी कमी अधिक ओलीवर खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या. आता काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर पेरणी केलेला खरिपाचा हंगाम धोक्यात येऊ शकतो. असा देखील तर्क शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महेिने उलटल परंतु पावसात जोर नसल्याने श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाई कायम दिसून येते. त्यामध्ये रोहिणी व मृग नक्षत्र हे मोठ्या पावसाचे नक्षत्र समजले जाते. परंतु या दोन्ही नक्षत्रांमध्ये पावसाने पूर्णतः पाठ फिरवल्याने पुढे देखील पावसाचे भवितव्य कसे असेल याविषयी शेतकऱ्यांमधून तर्क व्यक्त केला जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी