पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंची सरकारकडे ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी
By : Polticalface Team ,Sat Jul 09 2022 22:19:18 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर अद्याप तरी तोडगा निघालेला नाही. तर आता राज्यातील ९२ नगरपालिका तसेच ४ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. त्यामुळे यावर राज्यातील ओबीसी नेत्यांनी भाष्य केलं आहे.
धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा निकाल लागल्याशिवाय निवडणूका नको अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणूक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धनंजय मुंडे यांनी ओबीसींच्या आरक्षणाविषयी मत मांडताना म्हटलं आहे की, ओबीसी आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
याबरोबरच पंकजा मुंडे यांनीही या विषयावर भाष्य करत ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता यावर राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे
वाचक क्रमांक :