औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले की...

By : Polticalface Team ,Sun Jul 10 2022 21:00:43 GMT+0530 (India Standard Time)

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले की... औरंगाबाद : उस्मानाबाद, औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत आम्हाला माहित नव्हतं. हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. राष्ट्रवादीच्या व्यासपाठीवार नामांतराबाबत चर्चा झालेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नामांतराच्या मुद्दावरून अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यपाल,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मध्यावधी निवडणुकीबाबात ते म्हणाले, मध्यावधी निवडणुका लागतील, असे मी म्हणालो नव्हतो. २०२४ च्या निवडणुकीसाठी आतापासून तयारीला लागा,अडीच वर्षे राहिली आहेत, अस मी म्हणलो होतो.

विधानसभा निवडणुका तिन्ही पक्षाने एकत्रपणे लढण्याचा माझी मनस्थिती आहे. परंतु याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा झालेली नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर बंडखोरी करणाऱ्या बंडाला आधार नाही. त्यामुळेच ते राष्ट्रवादीवर सतत आरोप करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.

औरंगाबादच्या नामांतरावरून पवार म्हणाले, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आम्हाला समजलं.

यापेक्षा औरंगाबादच्या मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. भावनेचा प्रश्न उपस्थित केला नसता तर आनंद झाला असता, याबाबत आमच्या पक्षाच्या व्यासपीठावर याची चर्चा झालेले नाही. आता मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्याने तो मान्य करायला हवा

त्याचबरोबर राज्यपाल यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक वर्षभर घेतली. मात्र आताचे सरकार स्थापन करण्यासाठी, अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी राज्यपालांनी कार्यक्षमता दाखविली आहे, असा शब्दांत राज्यपालांवर पवारांनी निशाणा साधला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष