By : Polticalface Team ,Tue Jul 12 2022 16:44:24 GMT+0530 (India Standard Time)
औरंगाबाद : आम्ही औरंगजेबचे भक्त अजिबात नाही पण औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. याचे मुख्य कारण शहराचे नामांतर केल्यानंतरचा सर्व शैक्षणिक कागदपत्रांमध्ये बदल करावा लागेल तो करण्याचा खर्च उद्धव ठाकरे देणार आहेत का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
नामांतराचा निर्णय घेताना औरंगाबादकरांचे मत लक्षात घेतले नाही. शहरात एखादे दारुचे दुकान सुरू किंवा बंद करायचे असेल तर निवडणूक घेतात मग नामांतराचा विषय तर औरंगाबादकरांच्या जिव्हाळ्याचा आहे.
यावर सरकारने निवडणूक घ्यावी, त्यानंतर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल
, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला म्हणून शिवसेना-भाजपवाले धमक्या देत आहेत. पण आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही, असे खासदार जलील म्हणाले. आजच्या मूकमोर्चामध्ये मी खासदार म्हणून नाही तर औरंगाबादचा एक सामान्य नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याची भावना खासदार जलील यांनी यावेळी बोलून दाखवली.