मुख्यमंत्र्यांचा शपतविधी बेकायदेशीर, मंत्रिमंडळ विस्तार करू नका; राज्यपालांना शिवसेनेचे पत्र
By : Polticalface Team ,Tue Jul 12 2022 19:11:49 GMT+0530 (India Standard Time)
नाशिक : जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून. यामुळे अनेक नागिरकांच्या घरात पाणी शिरले आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदाकाठच्या रहिवाशांच्या घरांना पाण्याने वेढा घातला आहे.
या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान अजूनही पूर परिस्थिती वाढल्यास आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिली आहे.
गोदावरी नदीला पूर आल्याने काठावरील नागरिकांना अगोदरच सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता. मात्र नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील नदी काठावरील घरे, परिसरात पाण्याने वेढा घातला.
यामुळे जवळपास 200 रहिवाशांना शाळांमध्ये व मंगल कार्यालय सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
सायखेडा व चांदोरी या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यास गावातील नागरिकांनी सावधानगिरी बाळगावी, वेळप्रसंगी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
वाचक क्रमांक :